शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

सरकारनेच ठरविली भ्रष्टाचार करण्याची पदे!

By admin | Updated: June 7, 2015 03:11 IST

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये कार्यकारी व अकार्यकारी असे विभाजन केले असून, भ्रष्टाचाराशी संबंध येत नाही

सुधीर लंके, पुणेराज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये कार्यकारी व अकार्यकारी असे विभाजन केले असून, भ्रष्टाचाराशी संबंध येत नाही, अशी पदे ढोबळमानाने अकार्यकारी स्वरूपाची असल्याचे अजब उत्तर या आदेशासंदर्भात ‘लोकमत’ला दिले आहे. थोडक्यात सरकारनेच कोणत्या पदांवर राहून भ्रष्टाचार होऊ शकतो, हे ठरविले आहे. या अजब आदेशाबाबत अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही असंतोष आहे.शिक्षण विभागाचे उपसचिव रवींद्र आटे यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशानुसार राज्याचे आठही शिक्षण संचालक, चार सहसंचालक, परीक्षा परिषदेचे आयुक्त, शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयातील उपसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा पातळीवरील शिक्षणाधिकारी आदी ३९ पदे कार्यकारी स्वरूपाची ठरविण्यात आली आहेत. तर, याच दर्जाचे काही संचालक, सहसंचालक, उपसंचालक व जिल्हा पातळीवरील शिक्षणाधिकारी आदी ४८ पदे अकार्यकारी ठरवली आहेत. कार्यकारी व अकार्यकारी पदांवरील एकाच संवर्गातील अधिकाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, वेतन, सेवाशर्ती समान आहेत. निरंतर शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी व प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा दर्जा एकसमान आहे. पण, निरंतरचे पद अकार्यकारी ठरते. त्यामुळे शासनाने मुळात पदांमध्ये असा भेदभाव का निर्माण केला असा प्रश्न निर्माण झाला आहे.अधिकाऱ्याचे निलंबन संपुष्टात आल्यानंतर त्याला पुन्हा नियुक्ती देताना अकार्यकारी पद द्यावयाचे असते, यासाठी पदांचे वर्गीकरण केल्याचे आदेशात म्हटले आहे. ३१ मेनंतर बदल्या कोणत्याही परिस्थितीत ३१ मेनंतर बदल्या करू नका. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, असा आदेश आहे. मात्र, शिक्षण विभागाने प्रशासन व प्रशिक्षण शाखेच्या बदल्यांचे आदेश २ जूनला काढल्याचे दिसत आहे. मागील तारखेने हा आदेश संकेतस्थळावर अपलोड केल्याचा संशय आहे. गैरव्यवहार न करता येणारी पदे अकार्यकारीआदेशासंदर्भात गत दोन दिवस शिक्षणमंत्री विनोद तावडेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु ते दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. शिक्षणसचिव नंदकुमार रजेवर असल्याने त्यांचाही संपर्क झाला नाही. उपसचिव रवींद्र आटे यांनी, ‘जेथे जनतेचा संपर्क असतो, जेथे योजना असतात अशी पदे कार्यकारी तर जेथे जनसंपर्क नसतो, गैरव्यवहार होऊ शकत नाही ती पदे अकार्यकारी’ अशा ढोबळ निकषांवर हे वर्गीकरण केल्याचे सांगितले. - शासकीय बदल्यांत ‘कार्यकारी’ पदांचा भाव वाढविण्यासाठी मंत्रालयाने हा खटाटोप अत्यंत चतुराईने केल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे. नेमका बदल्यांच्या कार्यकाळात हा आदेश निघाला हेही विशेष!