शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Maratha Reservation: सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही; विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:49 IST

सरकारचा हेतूच शुद्ध नाही़ मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केला़

लोहारा (उस्मानाबाद) : मराठा आरक्षण देण्याची सरकारची इच्छाच नाही़ धनगर समाजाला पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देऊ, असे सांगतिले होते़ मुस्लिम समाजाला उच्च न्यायालयानेही मंजूर केलेले ५ टक्के शैक्षणिक आरक्षण या सरकारमुळे गेले़ यांचा हेतूच शुद्ध नाही़ मराठा तसेच इतर समाजालाही यांना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज येथे केला़

दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त विखे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा दौऱ्यावर होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक वेळी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊ द्या, असेच तुणतुणे सरकारने वाजवले़ आता अहवाल आला आहे़ पाहूया काय करतात ते़ मुळातच यांना कोणासही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप विखे यांनी केला़ जलयुक्त शिवारचे मुख्यमंत्री कौतुक करीत सुटले आहेत़ मात्र, हे जलयुक्त नव्हे ‘झोलयुक्त’ शिवार आहे़ या योजनेतून केवळ कंत्राटदारांची अन् त्यांच्यामागे असलेल्या पक्षाच्या बगलबच्च्यांची घरे भरली जात आहेत़ शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरु आहे़ ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणून गाजावाजा केला़ आतापर्यंत केवळ १६ हजार कोटींचीच कर्जमाफी झालीय़ दुष्काळ आॅगस्टमध्येच जाहीर करायला हवे होते़ जेणेकरुन आता निर्माण झालेल्या चारा-पाण्याच्या संकटावर उपाययोजना करता आली असती़ सध्या लोकांना फसवण्याचा एकमेव धंदा सरकारकडून सुरु असल्याचा आरोपही विखे यांनी केला़ खरीप पिक गेल्याने खरीपातील कर्ज माफ करावे व रबीची पेरणीच नसल्याने शेतकऱ्यांना पुढच्या आठ महिन्यांच्या उदरनिर्वाहासाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणीही विखे यांनी मांडली़

बैठका कसल्या घेता, खेड्यात फिरा...दुष्काळी उपाययोजना आखण्याची, निधी उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते़ मात्र, सरकार भिकेला लागले असेल, यांच्याकडे इतकी दानत नसेल, क्षमता नसेल तर सत्तेतून बाजूला व्हावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला़ मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना ते म्हणाले, ते जिल्हानिहाय आढावा बैठका घेत फिरत आहेत़ अधिकाऱ्यांच्या आकडेवारीवर निष्कर्ष काढत सुटले आहेत़ थोडे खेड्यात फिरुन दुष्काळ पहा म्हणजे समजेल़

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील