शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘मराठा आरक्षणाचा सरकारचा निर्णय न्यायपूर्ण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:32 IST

मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही.

मुंबई - मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. समाजातील फार कमी लोक सुशिक्षित आहेत. मात्र, संधीच्या अभावी त्यांना मिळेल ते काम करावे लागते. मागास समाजातील एखादी व्यक्ती मोठी झाली, तिला राजकीय ताकद मिळाली म्हणजे संपूर्ण समाज पुढे गेला, असे होत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायपूर्ण आहे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणारे याचिकाकर्ते दिलीप पाटील यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला.गायकवाड समितीने मराठवाड्याचा जास्त अभ्यास केला आहे. कारण या भागात मराठा समाजातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. येथील समस्या गंभीर आहेत. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. येथेच रोजगाराच्या कमी संधी उपलब्ध आहेत आणि हाच भाग जास्त मागास आहे. समितीने तज्ज्ञ संस्थांना मराठा समाजाचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यामुळे समितीकडे असलेली माहिती ही कोणाकडून मागविलेली नाही, तर प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करून संकलित करण्यात आली आहे, असा युक्तिवाद दिलीप पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला.एखाद्या समाजाची एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीत शिकते आणि राजकीय ताकद मिळवते म्हणून तो समाज मोठा होत नाही. याचे उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे, असा युक्तिवाद ढाकेफाळकर यांनी केला. समितीने ४८ पेक्षा अधिक निकष लावून मराठा समाज मागास आहे की नाही, याचा अभ्यास केला. त्यानंतरच मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष काढला आणि याच समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारचा हा निर्णय न्यायपूर्ण आहे, असे ढाकेफाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMaratha Reservationमराठा आरक्षण