शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकार बैलगाडामालकांसोबत : मुख्यमंत्री

By admin | Updated: September 19, 2016 01:13 IST

बैलगाडा शर्यतींवरील बंदी दूर करून त्या त्वरित सुरू कराव्यात, असे निवेदन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

मंचर : बैलगाडा शर्यतींवरील बंदी दूर करून त्या त्वरित सुरू कराव्यात, असे निवेदन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. शर्यत सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकार बैलगाडा मालकांसोबत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, त्यांची भेट भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली. या वेळी बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटावी, अशी मागणी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रविजी अनासपुरे, पांडुरंग ठाकूर, भगवान शेळके, अ‍ॅड धर्मेंद्र खांडरे, शरद बुट्टे-पाटील, अतुल देशमुख, संजय थोरात, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, डॉ. हरीष्श खामकर, मारुती भवारी, कैलास राजगुरव, बाबू थोरात, नवनाथ थोरात, गणेश बाणखेले आदी उपस्थित होते.बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले असून, परंपरेनुसार सुरू असलेल्या यात्रा बंद पडल्याने उत्साह मावळला आहे. या शर्यती त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. जयसिंग एंरडे म्हणाले, की बैलगाडा शर्यतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरी, तसेच बैलगाडा मालक नाराज झाले आहेत.बैलगाडा शर्यती सुरू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असून, बैलगाडा मालकांसोबत आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारने दोन विधिज्ञ दिले असून, ते बैलगाडा मालकांची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. बैलगाडा मालकांबरोबर चर्चा करायची आहे. चार बैलगाडामालकांना चर्चेसाठी आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जर निकाल विरुद्ध गेला, तरी संसदेत यासंदर्भातील कायदा करण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वार्ताहर)