शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरकारने वीजग्राहकांचा विश्वासघात केला-  प्रताप होगाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:20 IST

वाढीव वीजदरानुसार राज्यातील सर्व लघुदाब, उच्चदाब वीजग्राहक, उपसा सिंचन योजनांस सप्टेंबरची बिले आली आहेत. राज्यातील यंत्रमागांसह सर्व लघुदाब आणि उच्चदाब उद्योगांच्या बिलातील वाढ किमान १० टक्के ते कमाल २०-२५ टक्क्यापर्यंत आहे.

मुंबई : वाढीव वीजदरानुसार राज्यातील सर्व लघुदाब, उच्चदाब वीजग्राहक, उपसा सिंचन योजनांस सप्टेंबरची बिले आली आहेत. राज्यातील यंत्रमागांसह सर्व लघुदाब आणि उच्चदाब उद्योगांच्या बिलातील वाढ किमान १० टक्के ते कमाल २०-२५ टक्क्यापर्यंत आहे. उपसा सिंचन योजनांच्या बिलातील वाढ १२ ते १५ टक्के आहे. बिले मिळाल्यानंतर वस्तुस्थिती कळल्याने उद्योजक आणि शेतकरी नाराज आहेत. सरकारने वीजग्राहकांचा विश्वासघात केल्याची टीका महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केली आहे.आॅगस्ट, २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या भाजपाच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये दरवाढ होऊ देणार नाही, भारनियमन मुक्ती करू, वितरण गळती कमी करू, अशी आश्वासने देण्यात आली. ती पूर्ण केली नाहीत.वीज नियामक आयोगाने २० हजार ६५१ कोटी रुपये म्हणजे १५ टक्के दरवाढीस मान्यता दिली. त्यापैकी ६ टक्के म्हणजे ८ हजार २६८ कोटी रुपये रक्कम आताच्या प्रत्यक्ष दरवाढीतून वसूल केली जाईल. त्यापैकी काही दरवाढीचा भाग हा एप्रिल २०१९ पासून लागू होईल. म्हणजे सध्याची प्रत्यक्षात लागू झालेली दरवाढ जेमतेम ४ टक्के आहे. उरलेली ९ टक्के म्हणजे १२ हजार ३८२ कोटींची रक्कम नियामक मत्ता आकार म्हणून एप्रिल २०२० नंतर राज्यातील सर्व वीजग्राहकांकडून पुढील काही वर्षांत व्याजासह संपूर्णपणे वसूल केली जाईल. जेमतेम ४ टक्के वाढ झाल्यानंतर, बिले १५ ते २० टक्क्यांनी वाढली. परिणामी, १५ टक्के आकारणीचा हिशोब काय होईल, याची धास्ती ग्राहकांना आहे, अशी भीतीही होगाडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरण