शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शासनच जबाबदार

By admin | Updated: July 22, 2014 01:19 IST

अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले.

मुंबई : अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्नही केले. मात्र चारही बाजूने पडलेला आगीच्या ज्वाळांचा वेढा.. एका जवानाचा झालेला दुर्दैवी अंत या घटनेतून पुन्हा ‘संकटमोचक’ असणा:या अग्निशमन दलाच्या जवानांना संकटात अडकावे लागले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर युवा पिढीनेही इवलेकरांच्या मृत्यूला शासनच जबाबदार असल्याचे मत मांडले आहे. तर काहींनी शासन म्हणजे ही व्यवस्था बदलली पाहिजे, तरच समाजाबद्दलची संवेदनशीलता राज्यकत्र्याना जाणवेल, असेही मत मांडले. एरव्ही केवळ ‘सोशल’ नेटवर्किगवर अॅक्टिव्ह असणा:या तरुणाईने या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केलीच, मात्र त्यापेक्षाही त्यांच्या मनातील व्यवस्थेबद्दलचा रोष कित्येक पटीने जास्त होता. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी त्यात सामील झालेच पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला आहे.
संकलन - स्नेहा मोरे
 
बिल्डरांना 
चाप बसवा
- किरण कोकरे
अंधेरी येथील दुर्घटनेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. कारण काचेच्या उत्तुंग इमारतींचे बांधकाम करणा:या बिल्डरांना राजकत्र्याची फूस असते. शिवाय, या बिझनेस पार्कमध्येही बडय़ा सेलीब्रिटींची कार्यालये आहेत. त्यामुळे या उंचच उंच बिल्डिंगचे बांधकाम करणा:या बिल्डरांना चाप बसवला पाहिजे. इवलेकरांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी बॉलीवूडच्या सेलीब्रिटींनी पुढाकार घेतला आहे, हे ऐकून बरे वाटले. मात्र या प्रक्रियेत दिखावा नसावा, त्याची केवळ चर्चा नसावी कृतिशील पुढाकार असेल तरच त्याचा उपयोग आहे.
 
जवानांच्या प्राणांची 
जबाबदारी कुणाची?
- मुकुलिना कोलते
अंधेरी लोटस बिझनेस पार्क दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नितीन इवलेकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी दिला. आपल्या येथील शासनाच्या उदासीनतेचे यापेक्षा मोठे उदाहरण नाही. अंधेरी येथील घटना उदाहरणादाखल आहे, मात्र अशा अनेक घटनांमध्ये शासनाने ‘कानाडोळा’ केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पुरेसे चांगल्या दर्जाचे सुरक्षा साहित्य मिळू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांत अग्निशमन दलाच्या गणवेशांचा, त्यांच्या घरांचाही प्रश्न उभा राहिला होता. राजकारण करून आपला ‘गल्ला’ भरणा:या राज्यकत्र्याना जाग येण्यासाठी अशा किती लोकांना प्राण द्यावे लागणार आहेत. त्यांच्या प्राणांची जबाबदारी कुणाची? याचे उत्तर राज्यकत्र्यानी द्यावे.
 
सुरक्षारक्षकांनाही 
द्यावे प्रशिक्षण
- अक्षया घाडीगावकर
अंधेरी येथे घडलेली दुर्घटना पाहता आता अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यालय परिसरातील सुरक्षारक्षकांनाही आग विझवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले पाहिजे. या घटनेदरम्यान इवलेकर यांच्या पत्नीने पालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन मागितले होते, यावर 
काही स्तरांतून टीकाही करण्यात आली. मात्र इवलेकर यांच्या पत्नीची 
ही भूमिका अत्यंत योग्य होती. कारण आधीच शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे इवलेकर यांचे प्राण गमावले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर शासनाच्या पाय:या ङिाजवण्यापेक्षा इवलेकर यांच्या पत्नीने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
 
सिस्टीम बदलली पाहिजे
- श्रुती राऊते
लोटस बिझनेस पार्कला लागलेली आग ही अत्यंत दु:खदच आहे. मात्र त्यात मृत्यू पावलेल्या इवलेकरांच्या कुटुंबीयांचा कणाच गमावल्याची सल त्यांना कायम राहील. इवलेकरांच्या जाण्याची ही उणीव भरून न येण्यासारखीच आहे, मात्र याला केवळ पालिका, बिल्डर जबाबदार नसून संपूर्ण व्यवस्थाच जबाबदार आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र यामध्ये पहिल्यांदा अग्निशमन दलाच्या जवानांना अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य पुरविले पाहिजे. जेणोकरून अग्निशमन दल सक्षम होईल.