शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सुरुवात तर चांगली झाली !

By admin | Updated: October 30, 2015 01:13 IST

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले वर्ष सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक राहिले. विशेषत: आंबेडकरी जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्या या वर्षात मार्गी लागल्या.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले वर्ष सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक राहिले. विशेषत: आंबेडकरी जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्या या वर्षात मार्गी लागल्या. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न पहिल्या वर्षातच निकाली लागला. शिवाय, पुढील आठवड्यात लंडन येथील बाबासाहेबांच्या घराच्या लोकार्पणाचाही कार्यक्रम ठरला आहे. नव्या सरकारने याबाबत सकारात्मक दृष्टी ठेवत कामकाज चालविले आहे. नवी दिल्ली येथील अलीपूर रोडवरील ज्या बंगल्यात बाबासाहेबांनी आपला अंतिम श्वास घेतला त्या बंगल्याचे स्मारक करण्यासाठी मान्यता मिळाली, निधीही मिळाला. शिवाय जनपथ मार्गावर जवळपास पाच-सहा सरकारी बंगल्यांना एकत्र करत आंतराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारले जाणार आहे. एकूणच सुरुवात चांगली झाली आहे. जनतेला दिलेली सगळीच आश्वासने पहिल्या वर्षात पूर्ण होतील, असे नाही. दलित अत्याचार थांबविण्यासाठी आता प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळायला हवे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक आंतरजातीय विवाह होतील, त्यांना किमान २५ कोटी रुपये प्रोत्साहन निधी म्हणून द्यायला हवेत. जेणेकरून दलित-सवर्ण अंतर पुसण्याच्या दिशेने कार्यक्रम हाती घेतले जातील.