शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे चांगलेच! सदाभाऊंचा शेट्टींना प्रतिटोला

By admin | Updated: June 12, 2017 19:40 IST

यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 12 - यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे. त्यामुळे चांगल्याच बियाणांचा पुरवठा करू, बियाणे चांगलेच आहे. त्यामुळे उगवणही चांगलीच होईल, असा प्रतिटोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी खा. राजू शेट्टी यांना लगावला. कर्जमाफीचे श्रेय सर्वांनी घ्यावे. त्याचा आनंदही सर्वांनी लुटावा, असा चिमटाही त्यांनी काढला.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कर्जवाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सदाभाऊ खोत सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. राजू शेट्टी यांनी सोमवारीच घात आल्यावर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल तरच उगवण चांगली होईल, असा टोला सदाभाऊंना लगावला होता. त्याबाबत खोत म्हणाले की, खा. शेट्टी यांनी कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केले, ते माहीत नाही. पण मी कृषिमंत्री आहे. माझ्याकडून चांगल्याच बियाणांचा पुरवठा होईल. चांगले बियाणे निश्चित उगवेल!खोत यांना घात आली का? असा प्रश्न विचारला असता, यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज वर्तविला आहे, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.कर्जमाफीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटातून आपणाला वगळण्यात आल्याचा मुद्दा फेटाळत खोत म्हणाले की, सरकार एक कुटुंब असून, मुख्यमंत्री त्याचे कुटुंबप्रमुख आहेत. ते सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतात. मंत्रिगटाच्या स्थापनेवेळी त्यांनी सर्व मंत्र्यांशी चर्चा करून सामुदायिक निर्णय घेतला होता. त्यामुळे या गटातून मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याचे श्रेय कोणीही घ्यावे. ज्यांना आमच्यापासून आनंद घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा. समाजातील कोणताही घटक दु:खी असू नये, या भूमिकेतून सरकार काम करीत आहे. गेल्या दोन वर्षांत उसाचे आंदोलन उभे राहिले नाही. यातूनच सरकार शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचे सिद्ध होते.महिन्याभरात कर्जमुक्तीपुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. असा प्रकार राज्यात पहिल्यांदा घडला आहे. यापूर्वीच्या शासनाने कधी आंदोलनाबाबत सकारात्मक पाऊल उचलले नव्हते. त्याचा मी साक्षीदार आहे. मंत्रिगटाच्या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याच्या निकषाबाबत मंत्री व शेतकरी नेते यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची सुस्पष्टता होईल. आम्ही महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांची समिती नियुक्त करून शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्याचे सुरू केले आहे. येत्या महिन्याभरात कर्जमाफी निश्चित होईल, असेही खोत यांनी स्पष्ट केले.