शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

बियाणे चांगलेच! सदाभाऊंचा शेट्टींना प्रतिटोला

By admin | Updated: June 12, 2017 19:40 IST

यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 12 - यंदा पाऊसमान चांगले असल्याचे सांगितले जात आहे. त्यात माझ्याकडे कृषी खाते आहे. त्यामुळे चांगल्याच बियाणांचा पुरवठा करू, बियाणे चांगलेच आहे. त्यामुळे उगवणही चांगलीच होईल, असा प्रतिटोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी खा. राजू शेट्टी यांना लगावला. कर्जमाफीचे श्रेय सर्वांनी घ्यावे. त्याचा आनंदही सर्वांनी लुटावा, असा चिमटाही त्यांनी काढला.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी कर्जवाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी सदाभाऊ खोत सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. राजू शेट्टी यांनी सोमवारीच घात आल्यावर पेरणाऱ्यांचे बियाणे चांगले असेल तरच उगवण चांगली होईल, असा टोला सदाभाऊंना लगावला होता. त्याबाबत खोत म्हणाले की, खा. शेट्टी यांनी कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केले, ते माहीत नाही. पण मी कृषिमंत्री आहे. माझ्याकडून चांगल्याच बियाणांचा पुरवठा होईल. चांगले बियाणे निश्चित उगवेल!खोत यांना घात आली का? असा प्रश्न विचारला असता, यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज वर्तविला आहे, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य टाळले.कर्जमाफीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटातून आपणाला वगळण्यात आल्याचा मुद्दा फेटाळत खोत म्हणाले की, सरकार एक कुटुंब असून, मुख्यमंत्री त्याचे कुटुंबप्रमुख आहेत. ते सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतात. मंत्रिगटाच्या स्थापनेवेळी त्यांनी सर्व मंत्र्यांशी चर्चा करून सामुदायिक निर्णय घेतला होता. त्यामुळे या गटातून मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्याचे श्रेय कोणीही घ्यावे. ज्यांना आमच्यापासून आनंद घ्यायचा आहे, त्यांनी घ्यावा. समाजातील कोणताही घटक दु:खी असू नये, या भूमिकेतून सरकार काम करीत आहे. गेल्या दोन वर्षांत उसाचे आंदोलन उभे राहिले नाही. यातूनच सरकार शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचे सिद्ध होते.महिन्याभरात कर्जमुक्तीपुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. असा प्रकार राज्यात पहिल्यांदा घडला आहे. यापूर्वीच्या शासनाने कधी आंदोलनाबाबत सकारात्मक पाऊल उचलले नव्हते. त्याचा मी साक्षीदार आहे. मंत्रिगटाच्या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्याच्या निकषाबाबत मंत्री व शेतकरी नेते यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीची सुस्पष्टता होईल. आम्ही महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांची समिती नियुक्त करून शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती घेण्याचे सुरू केले आहे. येत्या महिन्याभरात कर्जमाफी निश्चित होईल, असेही खोत यांनी स्पष्ट केले.