शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज : एसटी जोमाने धावायला लागली हो! ८९ टक्के कर्मचारी रुजू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:05 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता.

मुंबई :  गेल्या साडेपाच महिन्यांपासून थांबलेली लालपरीची चाके गतिमान होऊ लागली आहेत. आतापर्यंत ८९ टक्के एसटी कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, बुधवारी ४ हजार ८८८ कर्मचारी कामावर परतले. दिवसभरात ७३ हजार ९७० कर्मचाऱ्यांनी गावोगावी सेवा दिली.एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. आता एसटी पुन्हा सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने संपकऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत ७३ हजार ९७० कर्मचारी सेवेत रुजू झाले असून, उद्यापर्यंत उर्वरित कर्मचारी हजर होतील, असे सांगण्यात आले.

नुकसानीचा अभ्यास करणार - परबआतापर्यंत एसटीचे किती नुकसान झाले, याचा अभ्यास करून नवीन धोरणे आखली जातील. मनुष्यबळाचे नियोजन आणि गुड्स ट्रान्सपोर्ट, डिझेल पेट्रोलपंप यासंदर्भातील प्रलंबित कामे येत्या काळात पूर्ण केली जातील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एसटी कर्मचारी भावूक आहेत. त्यांना खोटी स्वप्ने दाखवून काही लोकांनी पैसै कमावले, वेगळ्या दिशेला जाण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

२० एप्रिलचा एसटीचा हजेरीपट विभाग    एकूण कर्मचारी    हजर     परतलेले प्रशासकीय    १२००६     ११७९७     २०९ कार्यशाळा    १५७९१     १४३३२     १४५९ चालक    २९४८५     २६३७३     ३११२ वाहक    २४८२६    २१४६८     ३३५८ एकूण    ८२१०८     ७३९७०     ८१३८  

टॅग्स :ST Strikeएसटी संपBus Driverबसचालक