शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

गुड न्यूज! मान्सून राज्यात, येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; पुढील वाट मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 05:38 IST

पावसापूर्वी उसळलेल्या समुद्री तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे खोळंबलेल्या मान्सूनने केरळमध्ये आगमन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांची वेस ओलांडत महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांत व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आनंदघन कोसळला आणि मान्सून राज्यात दाखल झाल्याची सुवार्ता सगळीकडे पसरली. दरम्यान, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मान्सूनने संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा, तसेच रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनची प्रगतीची उत्तर सीमा रत्नागिरी, शिवमोगा, हासन, धर्मपुरी, श्रीहरिकोटा आणि धुबरी येथून जात आहे. येत्या ४८ तासांत आणखी प्रगती होणार आहे.

समुद्री लाटांनी मुंबईकरांना धडकी!

पावसापूर्वी उसळलेल्या समुद्री तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली होती. मरीन ड्राईव्ह, वरळी, दादर, वांद्रे सी लिंक, जुहू चौपाटी, मार्वे, उत्तन परिसरात चार मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळल्या होत्या. पालिकेचे जीवरक्षक आणि पोलिस दक्षतेसाठी सज्ज होते.

मान्सून अशी मारेल मजल

पुढील ४८ तास मान्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या ४८ तासात मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ईशान्य भागातील काही राज्य, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

चक्रीवादळ कुठे गेले?

बिपोरजॉय चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले असून सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी वादळ मुंबईपासून ५८० किमी दूर होते. १५ जूनदरम्यान वादळ मांडवी-कराची ओलांडण्याची शक्यता असून, ताशी १२५ ते १५० किमी वेगाने वारे वाहतील.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई