शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 06:55 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

मुंबई : पेरणी करून ढगांकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला हवामान विभागाने आता पुन्हा एकदा सुखद वार्ता दिली आहे. पुढील आठ दिवसात कमी-अधिक फरकाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी १४ ते १६ जुलै दरम्यान कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १४ ते २७ जुलै दरम्यान राज्यासह खान्देश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान बदलांमुळे राज्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात विविध ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पश्चिम विदर्भात तीन जण वाहून गेलेनदी-नाल्यांना पूर येऊन अकाेला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन जण वाहून गेले. त्यात ढोरपगाव (जि. बुलढाणा) गावातील सातवीत शिकणाऱ्या जय विठ्ठल तायडे (१३) याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील नाल्यात विळेगाव येथील ज्ञानेश्वर सुभाष राठाेड (४०) वाहून गेले तर अकाेल्यात जियान अहमद इकबाल अहमद (१०) वाहून गेला.

३०० मेल, एक्स्प्रेस, ४०६ पॅसेंजर रद्दनवी दिल्ली : पावसामुळे रेल्वेमार्गांमध्ये पाणी साचल्याने ७ जुलैपासून येत्या शनिवारपर्यंत ३०० मेल, एक्स्प्रेस ट्रेन व ४०६ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे ६०० मेल व ५०० पॅसेंजर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला. त्यातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काही दुसऱ्या मार्गावर वळविल्या.

टॅग्स :Rainपाऊस