शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:53 AM

स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी

मुंबई : स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.जिल्हा हागणदारीमुक्त योजनेतील ‘गुड मॉर्निंग’ पथकांच्या अतिउत्साही कारभारामुळे महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना त्रास होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच उघड्यावर शौचास जाणाºया महिलांचा सत्कार केल्याचा प्रकार समोर आला. याबाबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सोलापूर जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून दक्षता घेण्याची सूचना केली आहे. स्वच्छता अभियानाचा हेतू चांगला असून अनेक अधिकारी यात चांगले काम करतात. कारवाई करताना आततायीपणा करून महिलेला शरम, लज्जा वाटेल असा प्रकार घडू नये. महिलेचे नाव, फोटो, चित्रण किंवा ओळख उघड होईल असे प्रकार करू नयेत, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाºयांना दिल्या.सोलापूर जिल्हाधिकाºयांसोबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून स्वच्छता मोहीम, जिल्हा हागणदारीमुक्त अभियान राबविताना काळजी घेण्याचे तसेच महिलांबाबत संवेदनशीलता बाळगण्याचे निर्देशही रहाटकर यांनी दिले आहेत.आज महिलांच्या प्रश्नांवर जनसुनावणीठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवारी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता जनसुनावणी होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीस उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.