शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
3
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
4
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
5
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
6
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
7
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
8
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
9
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
10
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
11
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
12
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
13
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
14
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
15
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
16
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
17
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
18
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
19
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
20
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार

नागरिकांचे सुदृढ आरोग्य हा देखील विकासाचा भागच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:06 IST

आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

मीरा रोड - यापुढे संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी उपचार केंद्र उभारली जातील. मीरा-भाईंदर महापालिकेने रुग्णालयासाठी जागा द्यावी शासन ते बांधेल. यापुढे आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

राज्य शासनाने म्हाडाच्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेतील नागरिकांच्या उपचारासाठी महाजन सभागृहात 206 खाटांचे तर ठाकरे सभागृहात 165 खाटांचे दोन कोरोना रुग्णालय उभारून दिली आहेत. या दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड आदी उपस्थित होते. सरनाईक यांनी निधी व रेमिडिसीवीर आदी औषधे देण्याची तर महापौरांनी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.  मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. जे जे लागेल ते सरकार तुम्हाला देईल. आज सरकार ठाम उभे आहे म्हणून कोरोनाचा सामना आपण करतोय. पण प्रत्यक्ष लढाई स्थानिक यंत्रणेने करायची असते. अपेक्षा सर्वांच्याच आहेत. पण सरकार निराश करणार नाही. महापालिकेचा मायबाप राज्य सरकार असतो तर राज्य सरकारचा केंद्र सरकार. सुरुवातीच्या काळात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क मिळत नव्हते. पैशांची तर बोंब आहेच. तुम्ही निधीसाठी मला पत्र देता आणि मी केंद्राकडे पत्र देतो. परिस्थिती बिकट आहे पण ती वस्तुस्थिती आहे. रेमिडीसीवरचा पुरवठा सुरळीत असून त्याची किंमत देखील राज्य सरकारने कमी केली आहे. टॉसिझूलीमॅबची किंमत आटोक्यात आणून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु रेमिडिसीवीर, टॉसिझूलीमॅब, फेबिपिरावीर ही औषधे काही उपचार नाही, असे अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर आढळून आले. या औषधांचा अनावश्यक उपयोग जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या औषधांचा अतिरेक होता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.  कोविडच्या रुग्णास ऑक्सिजन कमी पडू देता कामा नये. राज्यात चाचणी वाढवली म्हणून रुग्ण संख्या वाढली आहे. म्हणून घाबरू नका. आपल्याला मृत्युदर कमी ठेवायचा आहे व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी ऑक्सिजनची गरज जास्त आहे . या संकटाच्या सुरुवातीला मुकाबला करण्यासाठी कोणीच सज्ज नव्हता. कोरोना वर लस 15 ऑगस्टला येणार असे म्हणतात.  लस लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे