शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागरिकांचे सुदृढ आरोग्य हा देखील विकासाचा भागच - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:06 IST

आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

मीरा रोड - यापुढे संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी उपचार केंद्र उभारली जातील. मीरा-भाईंदर महापालिकेने रुग्णालयासाठी जागा द्यावी शासन ते बांधेल. यापुढे आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. 

राज्य शासनाने म्हाडाच्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेतील नागरिकांच्या उपचारासाठी महाजन सभागृहात 206 खाटांचे तर ठाकरे सभागृहात 165 खाटांचे दोन कोरोना रुग्णालय उभारून दिली आहेत. या दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त डॉ. विजय राठोड आदी उपस्थित होते. सरनाईक यांनी निधी व रेमिडिसीवीर आदी औषधे देण्याची तर महापौरांनी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.  मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. जे जे लागेल ते सरकार तुम्हाला देईल. आज सरकार ठाम उभे आहे म्हणून कोरोनाचा सामना आपण करतोय. पण प्रत्यक्ष लढाई स्थानिक यंत्रणेने करायची असते. अपेक्षा सर्वांच्याच आहेत. पण सरकार निराश करणार नाही. महापालिकेचा मायबाप राज्य सरकार असतो तर राज्य सरकारचा केंद्र सरकार. सुरुवातीच्या काळात व्हेंटिलेटर, पीपीई किट, एन 95 मास्क मिळत नव्हते. पैशांची तर बोंब आहेच. तुम्ही निधीसाठी मला पत्र देता आणि मी केंद्राकडे पत्र देतो. परिस्थिती बिकट आहे पण ती वस्तुस्थिती आहे. रेमिडीसीवरचा पुरवठा सुरळीत असून त्याची किंमत देखील राज्य सरकारने कमी केली आहे. टॉसिझूलीमॅबची किंमत आटोक्यात आणून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परंतु रेमिडिसीवीर, टॉसिझूलीमॅब, फेबिपिरावीर ही औषधे काही उपचार नाही, असे अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यावर आढळून आले. या औषधांचा अनावश्यक उपयोग जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या औषधांचा अतिरेक होता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.  कोविडच्या रुग्णास ऑक्सिजन कमी पडू देता कामा नये. राज्यात चाचणी वाढवली म्हणून रुग्ण संख्या वाढली आहे. म्हणून घाबरू नका. आपल्याला मृत्युदर कमी ठेवायचा आहे व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत . त्यासाठी ऑक्सिजनची गरज जास्त आहे . या संकटाच्या सुरुवातीला मुकाबला करण्यासाठी कोणीच सज्ज नव्हता. कोरोना वर लस 15 ऑगस्टला येणार असे म्हणतात.  लस लवकरात लवकर येवो अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे