शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सारस... प्रेमाची अधुरी कहाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 12:50 IST

सारस हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यांत जगातील सर्वांत मोठा आहे.

राजेश शेगाेकारवृत्त संपादक (नागपूर)

मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही... अशा शब्दांत प्रेमाची शपथ घेतली जाते.. ही शपथ शब्दश: जगणारा एक प्राणी पृथ्वीतलावर आहे ताे म्हणजे सारस.. हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यांत जगातील सर्वांत मोठा आहे. शिवाय एका सारसचा मृत्यू झाल्यास दुसरा सारसदेखील मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे या पक्ष्यांची जाेडी प्रेमाचे प्रतीक समजली जाते... या पक्ष्याचा अधिवास सध्या महाराष्ट्रात केवळ विदर्भातील गाेंदिया जिल्ह्यात आहे.  गाेंदियाचे हे वनवैभव जतन व्हावे, सारसांचा अधिवास फुलावा असे प्रयत्न सातत्याने केले जातात. खुद्द उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही सरकारला याबाबत अनेकदा धारेवर धरले. त्यामुळे सारस संवर्धनाच्या उपाययाेजना सुरू झाल्या. मात्र, त्याही पुरेशा ठरत नसल्याची बाब २३ जूनच्या सारस पक्ष्यांच्या गणनेत समाेर आली. गाेंदियातील सारस पक्ष्यांची संख्या ६ ने कमी झाल्यामुळे सारस संवर्धन प्रेमाची कहाणी अधुरीच तर राहणार नाही ना?

अधिवास धाेक्यात येण्याची कारणेपाणथळ जागांची कमी हाेणारी संख्या

तलाव, नद्यांचे साैंदर्यीकरण केल्याने विहारावर बंधनेशेतीमध्ये वापरली जाणारी कीटकनाशके, खते उच्चदाब वीजवाहिन्यांचा मुक्त विहाराला अडसर तलावांची जैवविविधता नष्ट, व्यवस्थापनाकडे दुर्लक्षवाळू माफियांनी केलेले तलाव आणि नदीचे उत्खनन

उच्च न्यायालयानेही दिले निर्देश 

२०२१ मध्ये ‘लोकमत’च्या बातमीवरून नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेत शासन व राज्याचे वनखाते यांना धारेवर धरले. न्यायालयाच्या आदेशानुसार संवर्धन कृती आराखड्य़ाची रचनाही झाली. मात्र, उपाययाेजनांची गती संथ आहे. महाराष्ट्र राज्य पाणथळ स्थळे प्राधिकरणने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटसोबत करार केला आहे. त्यानुसार कोणती पावले उचलली, अशी विचारणाही केली आहे.

जिथे प्रणय फुलताे, ताे अधिवासच आला धाेक्यात

गाेंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण ७० वेगवेगळ्या ठिकाणी  सारस  पक्ष्यांचा  अधिवास  आढळताे.  मुख्यत: पाणथळ जागा, तलाव, नदीकाठांवर सारसांच्या जाेडींचा प्रणय फुलताे.

सारस पक्षी हा अधिवासाबाबत अतिशय संवेदनशील आहे. माणसाएवढा उंच असलेल्या सारस पक्ष्याचे घरटेही तेवढेच माेठे असते. या घरट्यात सारस पक्षी केवळ पावसाळ्यातच अंडी घालताे.

एकावेळी एक किंवा दाेन अंडी असे हे प्रमाण असते. तब्बल २५० ग्रॅम वजनाच्या या अंड्यातून सुमारे २६ ते ३५ दिवसांत पिल्लू बाहेर येते. या पिलाची काळजी सारस पक्ष्यांची जाेडी घेते. 

मात्र, आता वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रामधून माळढोक पक्षी पूर्णपणे नामशेष झाले आहेत. कदाचित पुढचा नंबर सारसचा असेल. 

सारस संवर्धनासाठी केवळ आराखड्याची घाेषणा झाली, निधीची तरतूद नाही. काही वर्षांत सारस पक्ष्यांबाबत ग्रामस्थ अतिशय सकारात्मक झाले आहेत. जनजागृती प्रभावी झाली, मात्र संवर्धनाबाबच्या उपाययाेजना कागदावरच आहेत -सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक,गोंदिया, अध्यक्ष सेवा संस्था