शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया:देवीदर्शनासाठी गेलेल्या तरूणाचा खून, तिघे मित्र कोण: रेल्वेस्थानकावर मृतक का थांबला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:39 IST

दुर्गोत्सवात डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला.

गोंदिया: दुर्गोत्सवात डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या २३ वर्षाच्या तरूणाचा खून करण्यात आला. त्याचा खून करणारे कोण या दिशेने रेल्वे पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणात आकस्मीक मृत्यूची नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. 

गोंदिया शहराच्या मनोहर चौक सिव्हील लाईन वॉर्ड क्र. ७ गोंदिया येथील सौरभ हेमराज वाढई (२३) हा आपल्या मित्रांसोबत २६ सप्टेंबरला डोंगरगड येथील बम्लेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. तो मित्रांसोबत २७ सप्टेंबर रोजी गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर आला. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सौरभचा मृतदेह गोंदिया रेल्वेस्थानकाच्या किमी नं.१०१२/२३ च्या मेन आपलाईन नागपूर अँड कडे मिळाला. शरीरापासून त्याचे मुंडके वेगळे होते. एक हात शरीरापासून वेगळा होता. दुसºया हाताचा चेंदामेंदा झाला होता. तो गोंदियातून मित्रांना घेऊन डोंगरगड येथे गेला होता. तेथून परत आल्यावर तो एकटाच गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर का थांबला ह्या गोष्टीचा अद्याप उलगडा झाला नाही. त्याने २७ सप्टेंबर रोजी डोंगरगड येथून सकाळी ७.५० वाजता डोंगरगड ते गोंदिया हे परतीच तिकीट घेतले होते. त्या एकाच तिकीटावर चार जणांचा  प्रवास नमूद केलेला होता. सर्व मित्र डोंगरगडवरून परतल्यावर सौरभने घरी न जाता रेल्वेस्थानकावरच मुकाम करण्याची इच्छा जाहीर केल्याची माहिती सुत्रांनूी दिली आहे. तो रेलञवेस्थानकावरच का थांबला. त्याच रात्री त्याचा खून होणे ही बाब विविध शंकाना वाव देत आहे. जे मित्र त्याच्या सोबत देवीदर्शनासाठी गेले होते त्यांनी यासंदर्भात घरच्यांना माहिती दिली का? असे एक ना अनेक प्रश्न या निमीत्ताने पुढे येत आहेत. गोंदिया रेल्वे पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करून नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मृताच्या आईनेचच पोलीस ठाणे गाठल्यामुळे त्याची ओळख पटली. तपास हवालदार निलेश बारड करीत आहेत.

चार दिवस उलटूनही जबाब नाही-

गोंदिया रेल्वे पोलीस खून प्रकरण दाखल करण्याच्या विचारात दिसत नाही. आपलाच काम वाढेल या भावनेतून रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचे दर्शवून आकस्मीक मृत्यूची नोंद रेल्वे पोलिसांनी घेतली आहे. परंतु हा अपघात किंवा आत्महत्या नसून खून असल्याचा दाट संशय आहे. या संदर्भात पोलिसांना कुणकुण लागली तरीही पोलिसांनी या संदर्भात कसलीही चौकशी केली नाही. चार दिवस लोटूनही आतापर्यंत मृताच्या घरच्यांचे बयाण सुध्दा झाले नाही.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा