शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 11:14 IST

दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील, हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

राजकारणात कटुता वाढलीअलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात  कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र, राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची  संस्कृती नाही. कटुता असेल तर ती  सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मीदेखील करेन, पण एक चांगले आहे की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यांच्याही आल्या नाहीत, पण अजून दिवाळी संपायची आहे, असेही ते म्हणाले.

पुन्हा युती होणार का? राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कधी पुन्हा युती होईल का, असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांनादेखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले.

...आवाज न करणारे फटाकेमहाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी जोरदार धमाके करणारे  देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मात्र आवाज न करणारे फटाके फोडायला आवडतात. नवनवीन गाड्या रात्री-बेरात्री एकट्यानेच ते अजूनही मुंबईत ड्राईव्ह करतात. राजकारणाच्या पलीकडच्या  प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आपण रात्री-बेरात्री मरिन ड्राईव्ह वगैरे ठिकाणी मित्रांकडील नवीन गाडीने तास-दोन तास फेरफटका मारत असतो, अशी नवीन माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. भुईचक्र, अनार असे आवाज न करणारे फटाके मला फोडायला आवडतात, माझे राजकीय फटाकेही आवाज करणारे नसतात, अशी कोटीही त्यांनी केली.

मी ‘सागर’वर सुखी आहेवर्षा बंगल्यावर जाऊ न शकल्याबद्दल छेडले असता, फडणवीस म्हणाले, शेवटी वर्षा सागरालाच जाऊन मिळते. बंगला कुठला ते महत्त्वाचे नाही. काम महत्त्वाचे असते. सध्या मी सागर/मेघदूतमध्ये आहे, सागर सकारात्मक आहे. मी इथे सुखी आहे. वर्षावर जाण्याचा कुठलाही विचार नाही. ‘आपल्यात संयम खूप आहे आणि तो इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे. फक्त भूक लागली की, माझा संयम ढळतो,’ असे खुसखुशीत उत्तर त्यांनी एका प्रश्नात दिले.

शिंदेंचा दिनक्रम हा  संशोधनाचा विषयरात्री उशिरापर्यंत जागून सकाळी पुन्हा दिनक्रम सुरू करणे हा माझ्या सवयीचा भाग आहे. मी रात्री तीनला झोपतो आणि आठला उठतो. पाच तास झोप घेतो, पण आठवड्यातून तीन-चार दिवस असे होते की, मला सकाळी ६ ला उठून तयार व्हावे लागते, पण या दिनक्रमाची आता सवय झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे तर रात्री झोपतच नाहीत. बहुधा त्यांचा दिनक्रम हा संशोधनाचा विषय आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण