शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 11:14 IST

दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.

लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील, हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.

राजकारणात कटुता वाढलीअलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात  कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र, राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची  संस्कृती नाही. कटुता असेल तर ती  सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मीदेखील करेन, पण एक चांगले आहे की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यांच्याही आल्या नाहीत, पण अजून दिवाळी संपायची आहे, असेही ते म्हणाले.

पुन्हा युती होणार का? राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कधी पुन्हा युती होईल का, असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांनादेखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले.

...आवाज न करणारे फटाकेमहाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी जोरदार धमाके करणारे  देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मात्र आवाज न करणारे फटाके फोडायला आवडतात. नवनवीन गाड्या रात्री-बेरात्री एकट्यानेच ते अजूनही मुंबईत ड्राईव्ह करतात. राजकारणाच्या पलीकडच्या  प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आपण रात्री-बेरात्री मरिन ड्राईव्ह वगैरे ठिकाणी मित्रांकडील नवीन गाडीने तास-दोन तास फेरफटका मारत असतो, अशी नवीन माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. भुईचक्र, अनार असे आवाज न करणारे फटाके मला फोडायला आवडतात, माझे राजकीय फटाकेही आवाज करणारे नसतात, अशी कोटीही त्यांनी केली.

मी ‘सागर’वर सुखी आहेवर्षा बंगल्यावर जाऊ न शकल्याबद्दल छेडले असता, फडणवीस म्हणाले, शेवटी वर्षा सागरालाच जाऊन मिळते. बंगला कुठला ते महत्त्वाचे नाही. काम महत्त्वाचे असते. सध्या मी सागर/मेघदूतमध्ये आहे, सागर सकारात्मक आहे. मी इथे सुखी आहे. वर्षावर जाण्याचा कुठलाही विचार नाही. ‘आपल्यात संयम खूप आहे आणि तो इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे. फक्त भूक लागली की, माझा संयम ढळतो,’ असे खुसखुशीत उत्तर त्यांनी एका प्रश्नात दिले.

शिंदेंचा दिनक्रम हा  संशोधनाचा विषयरात्री उशिरापर्यंत जागून सकाळी पुन्हा दिनक्रम सुरू करणे हा माझ्या सवयीचा भाग आहे. मी रात्री तीनला झोपतो आणि आठला उठतो. पाच तास झोप घेतो, पण आठवड्यातून तीन-चार दिवस असे होते की, मला सकाळी ६ ला उठून तयार व्हावे लागते, पण या दिनक्रमाची आता सवय झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे तर रात्री झोपतच नाहीत. बहुधा त्यांचा दिनक्रम हा संशोधनाचा विषय आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण