शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी जाताय...तर सावधान !

By admin | Updated: June 19, 2016 21:18 IST

पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात.

मनीषा म्हात्रे

मुंबई, दि. 19 -  पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात. मात्र हाच आनंद पर्यटकांच्या जिवावर बेतत असल्याचे समोर येते आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहात वर्षाला शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे किमान समुद्र किनाऱ्यांवर जाताना थोडी सावधानता बाळगा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील जुहू, गोराई, वरळी, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, आक्सा, मढ मरिन लाइन्ससह, बोर्डी-डहाणू, केवळे-माहीम, अर्नाळा, रायगड जिल्ह्यातील किहिम, अलिबाग, रेवदंडा, जंजिरा-मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील हेर्णे-मुरूड, गुहागर, वेळणेश्वर, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मिठबाव, कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ला येथील समुद्र किनारे पर्यटकांच्या दृष्टीने आनंद पर्वणी असतात. परंतु दुर्दैवानं दरवर्षी समुद्रकिनारी जवळपास शेकडोपेक्षा जास्त जण अतिउत्साहात बुडून मृत्युमुखी पडल्याचे विदारक दृष्य पाहावयास मिळते. इतकेच नव्हे तर, गेल्या देन-तीन वर्षांत ही संख्या वेगाने वाढत चालल्याचे दिसून येते. आजवर ज्या ज्या ठिकाणी पर्यटक बुडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, त्यापैकी बहुतांश ठिकाणी स्थानिक लोकांनी संबंधित पर्यटकाला तेथील समुद्राच्या आत जाऊ नका, असे सांगितल्याचे ऐकू येते. तसेच स्थानिकांकडून पर्यटकांना पाण्यातून बाहेर येण्याच्याही सूचना केल्या जातात. मात्र बहुतेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मग मरू द्या त्याला असे म्हणत निघून जातात, नाही तर त्याची मजा बघत बसतात. अशाच सूचनांकडे मुरुड येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुले आणि मुली समुद्रात ओढल्या गेल्या. समुद्राच्या आत जाऊ नका हे सांगण्यासाठी सरकारी माणूस सज्ज असेल किंवा न ऐकणा-यावर कायदेशीर कारवाईचे अधिकार स्थानिक माणसांकडे असतील तरच त्यांचा वचक पर्यटकांवर बसू शकेल. त्यामुळे पर्यटनासाठी समुद्र किना-यांवर जाताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत सेल्फी घेताना दोघांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील समुद्र किनारे, चौपाट्यांवर नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी पर्यटकांना सेल्फी काढण्यास मनाई केली. मात्र त्याच्या काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळाली. आजही मोठ्या संख्येने समुद्रात उतरून सेल्फी काढण्याची धडपड करताना दिसत आहे. रविवारीही पावसाची मजा घेत गोराई आणि जुहू समुद्रात उतरलेले पाच जण बुडू लागले. अचानक आलेल्या भरतीच्या लाटत ओढले जात असताना तेथील जीवरक्षकांनी त्यांना वाचविले म्हणून त्यांची यातून सुटका झाली. मात्र आणखी किती? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे पर्यटकांनीच स्वत:च्या जिवाची काळजी घेत समुद्र किना-यावर पर्यटनासाठी जाताना थोडी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे. आनंद लुटताना सुरक्षेला प्राधान्य गरजेचे

पर्यटकांच्या सागरी मृत्यूमुळे समुद्राला बदनाम करण्यापेक्षा, पर्यटनाचा आनंद लुटताना स्थानिक परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक निर्बंध-नियम यांची माहिती स्थानिकांकडून करून घेऊनच पुढील पाऊल टाकणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. पाणी सर्वत्र सारखे नसते, स्विमिंग पूलमध्ये पोहता आले म्हणजे कोणत्याही जलाशयात आपण पोहू शकतो, असा खोटा आत्मविश्वास मनात ठेवून आपल्याच जीवनास आव्हान देण्याचे खोटे धाडस करणे योग्य नाही, असाच बोध या दुर्दैवी घटनांनंतर घेणे आवश्यक आहे, इतके मात्र नक्की.सागरी पाण्याची कल्पना नसणा-या पर्यटकांचे मृत्यू

मुरुड समुद्र किनारी यापूर्वी महिंद्रा कंपनीतील ११ कर्मचा-यांचा, तर ६ जुलै २०१४ साली घाटला(चेंबूर) गावांतील सहा जणांचा, रत्नागिरी जिल्ह्यात सहा जणांचा, बेळगावमधील दोन बहिणींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबाग येथे, तर २६ सप्टेंबर २०१५ रोजी गुहागर समुद्रात सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनांच्या आधी स्थानिकांनी त्या पर्यटकांना धोक्याची सूचना आणि कल्पना दिली होती, पण त्यांनीही ती नाकारली होती, असे पोलीस नोंदीत नमूद केले आहे. हे सारे पर्यटक समुद्र किना-यापासून लांबच्या भागातील रहिवासी असल्याने त्यांना समुद्राचा अनुभव नव्हता. समुद्राची स्थानिक पातळीवरील माहिती नसणे आणि स्थानिकांच्या सूचनांचा अव्हेर यामुळे या दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी घडलेल्या दुर्घटना१ फेब्रुवारी २०१६ - पुण्याच्या कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १४ विद्यार्थ्यांचा रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. या महाविद्यालयातील १३० विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. ............................२२ फेब्रुवारी २०१६- नागाव समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील सात पर्यटकांपकी एकाचा बुडून मृत्यू झाला. सहदेव गणपत चव्हाण असे या पर्यटकाचे नाव आहे. ...........................२८ मे २०१६ - वसई येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली. प्रथमेश शिशुपाल आणि हितेश पाटील अशी त्यांची नावं आहेत...........................९ मे २०१५ - मालाड येथील आक्सा बिचवर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दिपक नामदेव शिंदे या ३१ वर्षाच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला