शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनासाठी जाताय...तर सावधान !

By admin | Updated: June 19, 2016 21:18 IST

पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात.

मनीषा म्हात्रे

मुंबई, दि. 19 -  पावसाच्या रिमझिममध्ये समुद्राच्या लाटांची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले समुद्र किनाऱ्यावर आपसुकच वळतात. मात्र हाच आनंद पर्यटकांच्या जिवावर बेतत असल्याचे समोर येते आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहात वर्षाला शेकडो पर्यटकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे किमान समुद्र किनाऱ्यांवर जाताना थोडी सावधानता बाळगा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील जुहू, गोराई, वरळी, दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, आक्सा, मढ मरिन लाइन्ससह, बोर्डी-डहाणू, केवळे-माहीम, अर्नाळा, रायगड जिल्ह्यातील किहिम, अलिबाग, रेवदंडा, जंजिरा-मुरुड, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील हेर्णे-मुरूड, गुहागर, वेळणेश्वर, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मिठबाव, कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ला येथील समुद्र किनारे पर्यटकांच्या दृष्टीने आनंद पर्वणी असतात. परंतु दुर्दैवानं दरवर्षी समुद्रकिनारी जवळपास शेकडोपेक्षा जास्त जण अतिउत्साहात बुडून मृत्युमुखी पडल्याचे विदारक दृष्य पाहावयास मिळते. इतकेच नव्हे तर, गेल्या देन-तीन वर्षांत ही संख्या वेगाने वाढत चालल्याचे दिसून येते. आजवर ज्या ज्या ठिकाणी पर्यटक बुडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत, त्यापैकी बहुतांश ठिकाणी स्थानिक लोकांनी संबंधित पर्यटकाला तेथील समुद्राच्या आत जाऊ नका, असे सांगितल्याचे ऐकू येते. तसेच स्थानिकांकडून पर्यटकांना पाण्यातून बाहेर येण्याच्याही सूचना केल्या जातात. मात्र बहुतेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मग मरू द्या त्याला असे म्हणत निघून जातात, नाही तर त्याची मजा बघत बसतात. अशाच सूचनांकडे मुरुड येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुले आणि मुली समुद्रात ओढल्या गेल्या. समुद्राच्या आत जाऊ नका हे सांगण्यासाठी सरकारी माणूस सज्ज असेल किंवा न ऐकणा-यावर कायदेशीर कारवाईचे अधिकार स्थानिक माणसांकडे असतील तरच त्यांचा वचक पर्यटकांवर बसू शकेल. त्यामुळे पर्यटनासाठी समुद्र किना-यांवर जाताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत सेल्फी घेताना दोघांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील समुद्र किनारे, चौपाट्यांवर नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी पर्यटकांना सेल्फी काढण्यास मनाई केली. मात्र त्याच्या काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे स्वरूपात पाहावयास मिळाली. आजही मोठ्या संख्येने समुद्रात उतरून सेल्फी काढण्याची धडपड करताना दिसत आहे. रविवारीही पावसाची मजा घेत गोराई आणि जुहू समुद्रात उतरलेले पाच जण बुडू लागले. अचानक आलेल्या भरतीच्या लाटत ओढले जात असताना तेथील जीवरक्षकांनी त्यांना वाचविले म्हणून त्यांची यातून सुटका झाली. मात्र आणखी किती? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे पर्यटकांनीच स्वत:च्या जिवाची काळजी घेत समुद्र किना-यावर पर्यटनासाठी जाताना थोडी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे. आनंद लुटताना सुरक्षेला प्राधान्य गरजेचे

पर्यटकांच्या सागरी मृत्यूमुळे समुद्राला बदनाम करण्यापेक्षा, पर्यटनाचा आनंद लुटताना स्थानिक परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक निर्बंध-नियम यांची माहिती स्थानिकांकडून करून घेऊनच पुढील पाऊल टाकणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. पाणी सर्वत्र सारखे नसते, स्विमिंग पूलमध्ये पोहता आले म्हणजे कोणत्याही जलाशयात आपण पोहू शकतो, असा खोटा आत्मविश्वास मनात ठेवून आपल्याच जीवनास आव्हान देण्याचे खोटे धाडस करणे योग्य नाही, असाच बोध या दुर्दैवी घटनांनंतर घेणे आवश्यक आहे, इतके मात्र नक्की.सागरी पाण्याची कल्पना नसणा-या पर्यटकांचे मृत्यू

मुरुड समुद्र किनारी यापूर्वी महिंद्रा कंपनीतील ११ कर्मचा-यांचा, तर ६ जुलै २०१४ साली घाटला(चेंबूर) गावांतील सहा जणांचा, रत्नागिरी जिल्ह्यात सहा जणांचा, बेळगावमधील दोन बहिणींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबाग येथे, तर २६ सप्टेंबर २०१५ रोजी गुहागर समुद्रात सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या सर्व घटनांच्या आधी स्थानिकांनी त्या पर्यटकांना धोक्याची सूचना आणि कल्पना दिली होती, पण त्यांनीही ती नाकारली होती, असे पोलीस नोंदीत नमूद केले आहे. हे सारे पर्यटक समुद्र किना-यापासून लांबच्या भागातील रहिवासी असल्याने त्यांना समुद्राचा अनुभव नव्हता. समुद्राची स्थानिक पातळीवरील माहिती नसणे आणि स्थानिकांच्या सूचनांचा अव्हेर यामुळे या दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी घडलेल्या दुर्घटना१ फेब्रुवारी २०१६ - पुण्याच्या कॅम्प भागातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १४ विद्यार्थ्यांचा रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. या महाविद्यालयातील १३० विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. ............................२२ फेब्रुवारी २०१६- नागाव समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या मुंबईतील सात पर्यटकांपकी एकाचा बुडून मृत्यू झाला. सहदेव गणपत चव्हाण असे या पर्यटकाचे नाव आहे. ...........................२८ मे २०१६ - वसई येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली. प्रथमेश शिशुपाल आणि हितेश पाटील अशी त्यांची नावं आहेत...........................९ मे २०१५ - मालाड येथील आक्सा बिचवर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या दिपक नामदेव शिंदे या ३१ वर्षाच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला