शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

उसाला एफआरपी दर देणार

By admin | Updated: January 20, 2015 01:42 IST

यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा ़निर्णय येत्या आठवड्यानंतर घेण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

न्हावरे / मांडवगण फराटा (जि़पुणे) : केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उसाला किफायतशीर वाजवी दर (एफआरपी) प्रमाणे भाव मिळेल, त्याचबरोबर यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याचा ़निर्णय येत्या आठवड्यानंतर घेण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़ मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऊस उत्पादकांना उसाला एफआरपीप्रमाणे भाव मिळावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे. केंद्रातून साखर कारखान्यांना मदत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन साखर निर्यातीवरील अनुदान, कारखान्यांवरील कर्ज, शॉट मार्जिन आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारची मदतीची भूमिका असल्याचा जेटली यांनी शब्द दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ शेतीस पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यास ठिबक सिंचन योजनेसाठी आघाडी सरकारने गेल्या ३ वर्षांपासून थकविलेली सबसिडी मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात देणार असल्याचे सूतोवाच करुन मुख्यमंत्री म्हणाले, दुग्ध उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढताना शासकीय अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळेल याची खबरदारी आम्ही घेतली असून, त्याच्या उपाययोजना शासकीय स्तरावरुन काटेकोरपणे अंमलात आणली जाईल़ मात्र दुधाच्या दराचा प्रश्न मिटविण्यासाठी शाश्वत स्वरुपाचा निर्णय घेण्यात येणार आहे़ आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, मागच्या सरकारने मात्र १०० कोटी रूपये रक्कम दुधउत्पादकांना न देता या व्यवसातील बड्या उद्योजकांच्या घशात घातली़ त्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यात येत्या काळात अमूल सारखा दुग्ध व्यवसायातील चांगला बँड निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. राज्यात दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना राबविण्यात येत असून जलसंधारणाच्या कामासाठी राज्य शासनाने १००० कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) च्सेंद्रिय शेतीबाबतचे सध्या राज्याचे धोरण असले, तरी बदलत्या परिस्थिती व काळानुरूप ते अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती करणारे तसेच त्यावर प्रयोग करणारे व तज्ज्ञांच्या सूचना मागवून घेऊन लवकरच राज्य शासन सेंद्रिय शेतीचे नवे धोरण जाहीर करणार आहे.च्स्वयंपूर्ण गावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे धोरण ठोसपणे राबविले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापुरात भारतीय संस्कृती उत्सव आरंभोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दिली़