शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:02 IST

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत फडणवीस सरकारने दिल्या होत्या, तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती देऊन मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली.यावेळी भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता. सरकारने खटला चालविण्यास टाळाटाळ करून तारखा मागितल्या. गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही. त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज झाला, असा आरोप राणे यांनी केला.राणे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय हातात आहे, परंतु सरकारने तसे केलेले नाही. केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. घटना दुरुस्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असेही राणे यावेळी म्हणाले . फडणवीस -पवार भेट अराजकीयदेंवद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट अराजकीय आहे. यापूर्वी मीदेखील पवार यांना भेटलो असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. या भेटीमुळे कोणाची प्रकृती बिघडणार असेल, तर त्यांनी औषध घ्यावं, इंजेक्शनदेखील उपलब्ध आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोडून इतर सर्व पक्ष आम्ही जाऊ असे म्हणतात. राष्ट्रवादी मात्र कोणीही येऊ दे आम्ही सरकारमध्ये असणार, असे म्हणत असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, असा पुनरुच्चार राणे यांनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maratha Reservationमराठा आरक्षण