शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 19:20 IST

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर निवेदन देण्यात आली. त्यात कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचाही मुद्दा होता. 

राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की, काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवतो. यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण, वाढती मजुरी, पडलेला आंबा-काजू दर, उष्णता यामुळे पीक धोक्यात आले आहे. तरीही या सर्वांशी संघर्ष करत कोकणातला स्वाभिमानी शेतकरी उभा आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दापोली कृषी विद्यापीठाने काजू बी उत्पादन खर्च प्रतिकिलो १२२ रुपये ५० पैसे काढला आहे. परंतु कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये काजूचा दर प्रतिकिलो ११० रुपयांपर्यंत घसरला आहे. शेजारच्या गोवा राज्याने काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. त्याप्रमाणे काजूला चांगला हमीभाव महाराष्ट्र सरकारने दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. काजू प्रक्रिया कारखानदार आणि व्यापारी यांची दर ठरवण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. 

दरम्यान, आयात केलेल्या काजू बी प्रक्रिया करून कोकणातील जी आय मानंकनाच्या नावाखाली तो खपवण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला शासनाकडून आळा घातला जात नाही. त्यामुळे दर घसरणीवरून काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काजू उत्पादनाचा हंगाम सुरू झाल्यावर हमी भाव मिळवून देण्याची लोकप्रतिनिधींना जाग येते. त्यामुळे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी