शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 19:20 IST

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर निवेदन देण्यात आली. त्यात कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचाही मुद्दा होता. 

राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की, काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवतो. यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण, वाढती मजुरी, पडलेला आंबा-काजू दर, उष्णता यामुळे पीक धोक्यात आले आहे. तरीही या सर्वांशी संघर्ष करत कोकणातला स्वाभिमानी शेतकरी उभा आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दापोली कृषी विद्यापीठाने काजू बी उत्पादन खर्च प्रतिकिलो १२२ रुपये ५० पैसे काढला आहे. परंतु कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये काजूचा दर प्रतिकिलो ११० रुपयांपर्यंत घसरला आहे. शेजारच्या गोवा राज्याने काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. त्याप्रमाणे काजूला चांगला हमीभाव महाराष्ट्र सरकारने दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. काजू प्रक्रिया कारखानदार आणि व्यापारी यांची दर ठरवण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. 

दरम्यान, आयात केलेल्या काजू बी प्रक्रिया करून कोकणातील जी आय मानंकनाच्या नावाखाली तो खपवण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला शासनाकडून आळा घातला जात नाही. त्यामुळे दर घसरणीवरून काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काजू उत्पादनाचा हंगाम सुरू झाल्यावर हमी भाव मिळवून देण्याची लोकप्रतिनिधींना जाग येते. त्यामुळे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी