शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 19:20 IST

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर निवेदन देण्यात आली. त्यात कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचाही मुद्दा होता. 

राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की, काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवतो. यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण, वाढती मजुरी, पडलेला आंबा-काजू दर, उष्णता यामुळे पीक धोक्यात आले आहे. तरीही या सर्वांशी संघर्ष करत कोकणातला स्वाभिमानी शेतकरी उभा आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दापोली कृषी विद्यापीठाने काजू बी उत्पादन खर्च प्रतिकिलो १२२ रुपये ५० पैसे काढला आहे. परंतु कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये काजूचा दर प्रतिकिलो ११० रुपयांपर्यंत घसरला आहे. शेजारच्या गोवा राज्याने काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. त्याप्रमाणे काजूला चांगला हमीभाव महाराष्ट्र सरकारने दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. काजू प्रक्रिया कारखानदार आणि व्यापारी यांची दर ठरवण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. 

दरम्यान, आयात केलेल्या काजू बी प्रक्रिया करून कोकणातील जी आय मानंकनाच्या नावाखाली तो खपवण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला शासनाकडून आळा घातला जात नाही. त्यामुळे दर घसरणीवरून काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काजू उत्पादनाचा हंगाम सुरू झाल्यावर हमी भाव मिळवून देण्याची लोकप्रतिनिधींना जाग येते. त्यामुळे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी