शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला किंमत द्या, नाही तर कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 04:11 IST

कर्जबाजारी आणि शेतमालाला किंमत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यापूर्वी अशाच परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जबाजारी आणि शेतमालाला किंमत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यापूर्वी अशाच परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मी ७१ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले होते, परंतु सध्याच्या सरकारातील निर्णय घेणारे लोक हे देशातील १८ ते २० टक्के शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. शेतमालाला एक तर किंमत द्या किंवा कर्जमाफी, अशी थेट भावना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सद्याच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली.शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव करण्यासाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि विश्वास सहकारी बँकेच्या वतीने रविवारी कार्यक्रम झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते नाशिककरांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, विठ्ठल मणियार, प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. पत्रकार अबंरिश मिश्र, सुधीर गाडगीळ व दत्ता बाळसराफ यांनी पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या केंद्रातील एका व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यांनी शेतकरी अठरा ते वीस टक्के आहे, दुसरीकडे ग्राहक ७८ ते ८० टक्के असून त्यांचा विचार करणे कधीही योग्यच असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारची मानसिकता त्यातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्याच वर्षी पीक कर्जाचे विक्रमी वाटप झालेच, परंतु अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गहू आयात करणारा भारत गहू निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. शेतकरी कधीही कर्ज थकवत नाही. पैसे बुडवणारी शेतकऱ्यांची जात नाही, सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असे वाटत नाही. त्यामुळे आता संघटित होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.संसदेत महाराष्ट्राचे संख्याबळ वाढवू न शकल्याने देशाचे सर्वोच्च पद मिळवण्याचा विचार आपण डोक्यातून काढून टाकला आहे. देशात एकपक्षीय लोकशाही घातक असून, काँग्रेसने पर्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.