शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

शेतमालाला किंमत द्या, नाही तर कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 04:11 IST

कर्जबाजारी आणि शेतमालाला किंमत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यापूर्वी अशाच परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जबाजारी आणि शेतमालाला किंमत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यापूर्वी अशाच परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मी ७१ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले होते, परंतु सध्याच्या सरकारातील निर्णय घेणारे लोक हे देशातील १८ ते २० टक्के शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. शेतमालाला एक तर किंमत द्या किंवा कर्जमाफी, अशी थेट भावना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सद्याच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली.शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव करण्यासाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि विश्वास सहकारी बँकेच्या वतीने रविवारी कार्यक्रम झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते नाशिककरांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, विठ्ठल मणियार, प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. पत्रकार अबंरिश मिश्र, सुधीर गाडगीळ व दत्ता बाळसराफ यांनी पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या केंद्रातील एका व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यांनी शेतकरी अठरा ते वीस टक्के आहे, दुसरीकडे ग्राहक ७८ ते ८० टक्के असून त्यांचा विचार करणे कधीही योग्यच असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारची मानसिकता त्यातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्याच वर्षी पीक कर्जाचे विक्रमी वाटप झालेच, परंतु अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गहू आयात करणारा भारत गहू निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. शेतकरी कधीही कर्ज थकवत नाही. पैसे बुडवणारी शेतकऱ्यांची जात नाही, सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असे वाटत नाही. त्यामुळे आता संघटित होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.संसदेत महाराष्ट्राचे संख्याबळ वाढवू न शकल्याने देशाचे सर्वोच्च पद मिळवण्याचा विचार आपण डोक्यातून काढून टाकला आहे. देशात एकपक्षीय लोकशाही घातक असून, काँग्रेसने पर्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.