शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पालघर परिसराला १६ एमएलडी पाणी द्या

By admin | Updated: March 3, 2017 03:12 IST

पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी

पालघर : शहर व आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याचे मुख्यालय, वाढता लोंढा आणि भविष्यात सिडकोच्या माध्यमातून होणारी नवीन पालघर वसाहत पाहता भविष्यात पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी अशी मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी पालक मंत्र्यांकडे केली आहे.प्रादेशिक नळपाणी योजनेतून पालघर शहरासह परिसरातील अन्य २६ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतील २.०० एमएलडी पाणी इतर गावाना व उर्वरित ३.४८ एमएलडी पालघर नगरपरिषदेसाठी उपलब्ध करण्यात आले होते. आजही तेवढेच अपुरे पाणी पालघर शहराला मिळत आहे. शासनाच्या निकषांनुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लिटर इतक्या पाण्याची गरज असतांना पालघरवासीयांना अपुऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. म्हणून २६ गाव नळपाणी योजनेच्या गावाना दररोज १६ एम एल डी पाणी देण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे केदार काळे ह्यानी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा व खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगांकडे केली .तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम ५० अन्वये पाणी पुरवठायोजना तयार करणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे म्हणून नविन स्वतंत्र योजना फक्त नगरपरिषदेसाठी तयार करण्यात यावी व आसपासच्या गावपाड्यांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना करावी अशी ही मागणी काळे यांनी केली आहे. (वार्ताहर)>लोकसंख्या गेली लाखांवर२००१ च्या जन गणनेनुसार पालघरची लोकसंख्या ५२ हजार ६७० इतकी असली तरी २०११ च्या जन गणाने नुसार ती ६८ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर तरंगती लोकसंख्या पकडून ती १ लाखापर्यंत पोहचली आहे.नळपाणी योजना मंजूर करताना या योजने साठी दररोज ५.४८ एम एल डी पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.