शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पालघर परिसराला १६ एमएलडी पाणी द्या

By admin | Updated: March 3, 2017 03:12 IST

पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी

पालघर : शहर व आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्याचे मुख्यालय, वाढता लोंढा आणि भविष्यात सिडकोच्या माध्यमातून होणारी नवीन पालघर वसाहत पाहता भविष्यात पाणीपुरवठा अपुरा पडणार असल्याने पाण्याच्या कोट्यात १६ एम एल डी इतकी वाढ करावी आणि स्वतंत्र योजना कार्यान्वित करावी अशी मागणी काँग्रेसचे केदार काळे यांनी पालक मंत्र्यांकडे केली आहे.प्रादेशिक नळपाणी योजनेतून पालघर शहरासह परिसरातील अन्य २६ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेतील २.०० एमएलडी पाणी इतर गावाना व उर्वरित ३.४८ एमएलडी पालघर नगरपरिषदेसाठी उपलब्ध करण्यात आले होते. आजही तेवढेच अपुरे पाणी पालघर शहराला मिळत आहे. शासनाच्या निकषांनुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लिटर इतक्या पाण्याची गरज असतांना पालघरवासीयांना अपुऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. म्हणून २६ गाव नळपाणी योजनेच्या गावाना दररोज १६ एम एल डी पाणी देण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे केदार काळे ह्यानी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा व खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगांकडे केली .तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलम ५० अन्वये पाणी पुरवठायोजना तयार करणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे म्हणून नविन स्वतंत्र योजना फक्त नगरपरिषदेसाठी तयार करण्यात यावी व आसपासच्या गावपाड्यांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना करावी अशी ही मागणी काळे यांनी केली आहे. (वार्ताहर)>लोकसंख्या गेली लाखांवर२००१ च्या जन गणनेनुसार पालघरची लोकसंख्या ५२ हजार ६७० इतकी असली तरी २०११ च्या जन गणाने नुसार ती ६८ हजार ८८५ इतकी झाली आहे. तर तरंगती लोकसंख्या पकडून ती १ लाखापर्यंत पोहचली आहे.नळपाणी योजना मंजूर करताना या योजने साठी दररोज ५.४८ एम एल डी पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.