शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

बारावीत यंदाही मुलींची बाजी

By admin | Updated: May 26, 2016 04:22 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलींचा निकाल ९०.५० तर मुलांचा ८३.४६ टक्के एवढा लागला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. मुलींचा निकाल ९०.५० तर मुलांचा ८३.४६ टक्के एवढा लागला आहे. बुधवारी आॅनलाइन निकाल जाहीर झाला. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८६.६० इतकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ४.६६ टक्क्यांची घट झाली. कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. राज्य मंडळाने फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेतलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी केली. विद्यार्थ्यांना ३ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित महाविद्यालयात मूळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल विक्रमी ९१.२६ टक्के लागला होता. यंदा मंडळाने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती केली होती. परिणामी विद्यार्थ्यांना सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या गुणांवर नियंत्रण आले. राज्यातील ४५७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के तर शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या ३६ आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमाचे एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यातील ७ लाख ३१ हजार ३९२ मुलांपैकी ६ लाख १० हजार ४०० मुले उत्तीर्ण झाले तर ५ लाख ८८ हजार ३६२ मुलींपैकी ५ लाख ३२ हजार ४८२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. (प्रतिनिधी)४५७ महाविद्यालये शंभर नंबरी४५७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के तर ३६ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला. शंभर टक्के निकालात पुणे विभागातील सर्वाधिक १०१, मुंबई विभागातील ६६, नागपूर विभागातील ५७, कोल्हापूरचे ५६, अमरावती व कोकणचे प्रत्येकी ४३, औरंगाबादचे ३४, लातूरचे १४ व नाशिक विभागातील १३ महाविद्यालये आहेत. शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद विभाग आघाडीवर आहे. तेथील १४ महाविद्यालयांचा यादीत समावेश आहे. लातूर विभाग ७, नागपूर विभाग ६, पुणे विभाग ५, मुंबई व अमरावती विभागाच्या प्रत्येकी २ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला. प्रवेशासाठी पुनर्मूल्यांकनात प्राधान्यआॅनलाइन निकालानंंतर विद्यार्थ्यांना ४ जूनपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. तर १४ जूनपर्यंत छायांकित प्रतीसाठी अर्ज करावा लागेल. छायांकित प्रति मिळाल्यानंतर ५ दिवसांपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तातडीने पुनर्मूल्यांकन करून घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी जेईई, नीट किंवा संंबंधित प्रवेश परीक्षांचे प्रवेशपत्र जोडावे लागेल.