शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी प्रियकर निर्दोष

By admin | Updated: November 17, 2015 01:05 IST

एका मुलीच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून मुलाला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले आहेत. आंतरधर्मीय प्रेम प्रकरणातून

नागपूर : एका मुलीच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून मुलाला निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले आहेत. आंतरधर्मीय प्रेम प्रकरणातून घडलेली ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.दीपक कुंडलिक कांबळे (२७) असे संशयिताचे नाव असून, चंडोल ता. बुलडाणा येथील रहिवासी आहे. त्याचे गावातच राहणाऱ्या मुस्लीम मुलीवर प्रेम होते. २९ मे २०११ रोजी दोघांनाही चाकूने भोसकण्यात आले. ३१ मे रोजी मुलीचा मृत्यू झाला आणि दीपक बचावला. मुलीने लग्नासाठी नकार दिल्यामुळे दीपकने तिची हत्या केली व स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. बुलडाणा सत्र न्यायालयाने दीपकला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास, तर कलम ३६६ अंतर्गत पाच वर्षे कारावास व ५००० रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम करावासाची शिक्षा सुनावली होती.या विरुद्ध दीपकने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयात सरकारी पक्षाला आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करता आला नाही. ‘आंतरधर्मीय प्रेमामुळे मुलीचे नातेवाईक संतप्त होते. घटनेच्या दिवशी दीपकने मुलीला भेटायला बोलावले होते. त्याचवेळी मुलीच्या नातेवाईकांनी तेथे पोहोचून दोघांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वत:चा बचाव करून दीपक पळून जाण्यात दीपक यशस्वी झाला,’ असा घटनाक्रम घडला असण्याची शक्यता उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेत व्यक्त केली. (प्रतिनिधी)