शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 15:43 IST

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण

शाम धुमाळ

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. भारतातील सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा दुहेरी बोगद्या आहे. या महामार्गावर मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहुन येण्यासाठी स्वतंत्र ८ कीलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील कसारा घाट भेदुन इगतपुरी जवळ हे बोगदे तयार करण्यात आले. 

या महामार्गांवरील पूर्णतवास गेलेल्या बोगद्याची रस्ते विकास महामंडळाचे अनिलकुमार् गायकवाड व उप जिल्हाधिकारी  तथा एम एस आर डी च्या प्रशासक रेवती गायकर यांनी अभियंत्या सोबत चाचणी व पाहणी केली.

दोन्ही बोगद्याची लांबी ८ कीलोमीटर असुन रुंदी १७.५ मीटर आहे. एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख सर व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते अशा बाहुबली टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला तो म्हणजे ८ कीलोमीटरचा हा दुहेरी बोगदा फक्त २ वर्षात पुर्ण झाला. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

५५ हजार कोटी रूपयांचा मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग ७०० कीलोमीटरचा असुन इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्वाचा टप्पा आहे. २७४५ कोटी रूपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतुक कोंडी नसेल तर आजच्या घडीला २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातुन कसारा घाट पार करण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागणार आहे. दोन वर्षात दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाल्याने एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला. याच दरम्यान शहापूर ते इगतपुरी दरम्यान सुरु असलेल्या नवयुगा कंपनी च्या कामांची देखील पाहणी  अधिकाऱ्यांनी केली असून समाधान कारक सुरु असलेल्या कामामुळे ठाणे ते नाशिक जिल्यातील हा टप्पा वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिक