शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 15:43 IST

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण

शाम धुमाळ

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. भारतातील सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा दुहेरी बोगद्या आहे. या महामार्गावर मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहुन येण्यासाठी स्वतंत्र ८ कीलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील कसारा घाट भेदुन इगतपुरी जवळ हे बोगदे तयार करण्यात आले. 

या महामार्गांवरील पूर्णतवास गेलेल्या बोगद्याची रस्ते विकास महामंडळाचे अनिलकुमार् गायकवाड व उप जिल्हाधिकारी  तथा एम एस आर डी च्या प्रशासक रेवती गायकर यांनी अभियंत्या सोबत चाचणी व पाहणी केली.

दोन्ही बोगद्याची लांबी ८ कीलोमीटर असुन रुंदी १७.५ मीटर आहे. एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख सर व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते अशा बाहुबली टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला तो म्हणजे ८ कीलोमीटरचा हा दुहेरी बोगदा फक्त २ वर्षात पुर्ण झाला. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

५५ हजार कोटी रूपयांचा मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग ७०० कीलोमीटरचा असुन इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्वाचा टप्पा आहे. २७४५ कोटी रूपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतुक कोंडी नसेल तर आजच्या घडीला २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातुन कसारा घाट पार करण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागणार आहे. दोन वर्षात दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाल्याने एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला. याच दरम्यान शहापूर ते इगतपुरी दरम्यान सुरु असलेल्या नवयुगा कंपनी च्या कामांची देखील पाहणी  अधिकाऱ्यांनी केली असून समाधान कारक सुरु असलेल्या कामामुळे ठाणे ते नाशिक जिल्यातील हा टप्पा वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिक