शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

‘मासिक पाळी’ विषयावर गज्वी यांचे नवे नाटक ‘कळीबंद पाऊस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 12:37 IST

महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही...  

ठळक मुद्देलवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत  ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटसध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल

नम्रता फडणीस- पुणे :  ‘किरवंत,’ ‘छावणी,’ ‘देवनवरी,’ शुद्ध बीजापोटी’ यांसारख्या नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या दर्जेदार कलाकृतींच्या मालिकेमध्ये आता आणखी एका  ‘हटके’ नाटकाची भर पडणार आहे. ते म्हणजे  ‘कळीबंद पाऊस.’ खरे तर या शीर्षकातच नाटकाचे संपूर्ण सार दडलेले आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अनेक लघुपटांसह हिंदीत  ‘पॅडमॅन’सारखा चित्रपटही आला. मात्र महिलांच्या मासिकचक्रावर नाटक लिहिण्याचा विचार एकाही नाटककारांच्या मनाला ‘शिवला’ नाही.  परंतु सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजातील विदारक सत्य मांडण्याची हातोटी असलेल्या डॉ. गज्वी यांनी महिलांशी निगडित अशा अत्यंत संवेदनशील विषयावर लेखन करण्याचे धाडस केले आहे. लवकरच हे नाटक पुस्तकरूपात वाचकांच्या भेटीला येणार आहे. ‘मासिक पाळी’ या विषयावर अजूनही विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होत नाहीत. अशा परिस्थितीत नाटकाच्या माध्यमातून मुलींचे वयात येणे, त्यांच्यात होणारे शारीरिक बदल या नैसर्गिक क्रियेकडे पाहण्याचा कुटुंबांचा दृष्टिकोन यावर डॉ. गज्वी यांनी लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाविषयी डॉ. गज्वी यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, की मी नेहमीच वेगळ्या विषयांच्या शोधात असतो. एखादा विषय डोक्यात आला, की माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि मी त्याची उत्तरे गवसण्याच्या मागावर लागतो. ग्रामीण भागात मुलीला पाळी आली, की ‘कावळा शिवला का?’ असा शब्दप्रयोग प्रयोग करून तिला लांब बसवले जाते. शहरी भागात हे चित्र फारसे दिसत नाही. पण मुलीला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची ओटी भरली जाते. तिच्यासाठी सगळेच नवीन असते. तिच्यात अनेक शारीरिक बदल घडत असतात. तिच्या वयात येण्यामुळे आई-वडिलांना येणारे दडपण, त्यांच्या मनात सुरू झालेले विचारचक्र असा सगळ्यांचा परामर्श नाटकात घेण्यात आला आहे. या विषयावर कुटुंब आणि समाजाचे प्रबोधन व्हावे, हा लेखनामागचा हेतू आहे. रंगभूमीवर असा प्रयोग अद्यापही कुणी केलेला नाही. पहिल्यांदाच असा विषय नाटकाच्या माध्यमातून मांडला जात आहे. या नाटकाची मूळ संहिता तयार झाली आहे. ..........सध्या या नाटकाच्या अभिवाचनातून हा विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. लवकरच नाटक पुस्तकरूपात आणण्याचा मानस आहे. माझी नाटके नेहमीच वेगळ्या धाटणीची राहिली आहेत. हा विषय प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरदेखील आणता येणे शक्य आहे, असे गज्वी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला