शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:33 IST

नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

नवी दिल्ली - सध्या सगळीकडे एकच पंगत राहिली आहे. वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे..? मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला असं सांगत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांतरावर भाष्य केले आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्या बोलत होत्या. 

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत करणार आहात हे वाटलेच होते. त्यामुळे जर वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं अजून गुणवर्णन करता आले असते. कार्यकर्त्याला कमी समजण्यासारखे कारण नाही. २०१२ पासूनचे शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवतायेत. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचं नियोजन करत होते. आता तपशीलात जात नाही. उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेलं फार आवडलं असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

तसेच बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. दिवसातून दोन तीनदा RT-PCR केली तरी भेटी मिळणार नाही हे आम्हाला माहिती नव्हते. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान, मी २००७ पासून आतापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. विधान परिषदेत मी काम करायला लागले, तेव्हा आमच्या नेत्याने सभागृहात पिस्तुल आणली होती मग दिवसभर त्यावरच चर्चा व्हायची. एकदा मी भाषणात जय भीम, जय महाराष्ट्र म्हणाले, तेव्हा आमच्या पक्षातील एका नेत्याला ते खटकले. आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले कुणी जय भीम म्हटलं नाही तुम्ही कसं म्हणाले असं त्यांनी विचारले. मी सार्वजनिक जीवनात कधीही डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटले. एका पेपरला ती बातमी आली. ती बातमी बाळासाहेबांनी वाचली आणि त्यांनी मला बोलवून घेतले. ते म्हणाले तुला जय भीम म्हणायला कुणी अडवले ते मी बघतो. तू खुशाल जय भीम, जय महाराष्ट्र म्हणू शकते. मी शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत शेवटपर्यंत राहणार हे मला सांगायला कमीपणा वाटत नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी आठवण सांगितली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना