शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:33 IST

नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

नवी दिल्ली - सध्या सगळीकडे एकच पंगत राहिली आहे. वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे..? मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला असं सांगत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांतरावर भाष्य केले आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्या बोलत होत्या. 

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत करणार आहात हे वाटलेच होते. त्यामुळे जर वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं अजून गुणवर्णन करता आले असते. कार्यकर्त्याला कमी समजण्यासारखे कारण नाही. २०१२ पासूनचे शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवतायेत. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचं नियोजन करत होते. आता तपशीलात जात नाही. उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेलं फार आवडलं असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

तसेच बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. दिवसातून दोन तीनदा RT-PCR केली तरी भेटी मिळणार नाही हे आम्हाला माहिती नव्हते. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान, मी २००७ पासून आतापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. विधान परिषदेत मी काम करायला लागले, तेव्हा आमच्या नेत्याने सभागृहात पिस्तुल आणली होती मग दिवसभर त्यावरच चर्चा व्हायची. एकदा मी भाषणात जय भीम, जय महाराष्ट्र म्हणाले, तेव्हा आमच्या पक्षातील एका नेत्याला ते खटकले. आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले कुणी जय भीम म्हटलं नाही तुम्ही कसं म्हणाले असं त्यांनी विचारले. मी सार्वजनिक जीवनात कधीही डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटले. एका पेपरला ती बातमी आली. ती बातमी बाळासाहेबांनी वाचली आणि त्यांनी मला बोलवून घेतले. ते म्हणाले तुला जय भीम म्हणायला कुणी अडवले ते मी बघतो. तू खुशाल जय भीम, जय महाराष्ट्र म्हणू शकते. मी शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत शेवटपर्यंत राहणार हे मला सांगायला कमीपणा वाटत नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी आठवण सांगितली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना