शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"२ मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद..."; ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 12:33 IST

नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

नवी दिल्ली - सध्या सगळीकडे एकच पंगत राहिली आहे. वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे..? मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला असं सांगत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांतरावर भाष्य केले आहे. दिल्लीच्या साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यात त्या बोलत होत्या. 

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत करणार आहात हे वाटलेच होते. त्यामुळे जर वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं अजून गुणवर्णन करता आले असते. कार्यकर्त्याला कमी समजण्यासारखे कारण नाही. २०१२ पासूनचे शिवाजी पार्कवरील सगळे कार्यक्रम मला आठवतायेत. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचं नियोजन करत होते. आता तपशीलात जात नाही. उद्धव ठाकरे गटाचे लोकही फार समोर नाहीत त्यामुळे ते असताना मला बोललेलं फार आवडलं असते. नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

तसेच बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते, मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटले. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होते. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयावर भेट नाही. दिवसातून दोन तीनदा RT-PCR केली तरी भेटी मिळणार नाही हे आम्हाला माहिती नव्हते. या सर्व गोष्टीचा विचार केला स्थित्यंतरे होण्यामागे बरीच कारणे असतात. त्यावर वेगळी चर्चा करायला जरूर माझी तयारी आहे असंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान, मी २००७ पासून आतापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलं आहे. विधान परिषदेत मी काम करायला लागले, तेव्हा आमच्या नेत्याने सभागृहात पिस्तुल आणली होती मग दिवसभर त्यावरच चर्चा व्हायची. एकदा मी भाषणात जय भीम, जय महाराष्ट्र म्हणाले, तेव्हा आमच्या पक्षातील एका नेत्याला ते खटकले. आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले कुणी जय भीम म्हटलं नाही तुम्ही कसं म्हणाले असं त्यांनी विचारले. मी सार्वजनिक जीवनात कधीही डोळ्यात पाणी येऊ देत नाही. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटले. एका पेपरला ती बातमी आली. ती बातमी बाळासाहेबांनी वाचली आणि त्यांनी मला बोलवून घेतले. ते म्हणाले तुला जय भीम म्हणायला कुणी अडवले ते मी बघतो. तू खुशाल जय भीम, जय महाराष्ट्र म्हणू शकते. मी शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत शेवटपर्यंत राहणार हे मला सांगायला कमीपणा वाटत नाही असंही नीलम गोऱ्हे यांनी आठवण सांगितली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना