शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम

By admin | Updated: February 4, 2017 16:25 IST

गझलाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझला सादर करुन उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली.

ऑनलाइन लोकमत 

पु. भा. भावे साहित्य नगरी , डोंबिवली, दि. 4 - गीत गुंजारते गझल, जीवनाला नवा अर्थ देते गझल हा गझलाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझला सादर करुन उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच गझलला स्थान मिळाल्याने महाराष्ट्रातून गझलकार आले आहेत. दोन दिवसात चालणाऱ्या या काव्ययात्रेमध्ये ११० गझलकरांनी गझल सादर केल्या.

कविवर्य सुरेश भट गझल दालनात गझलाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी कवी अशोक नायगावकर, गझल गंधर्व सुधाकरराव कदम, ज्येष्ठ गझलकार म.भ. चव्हाण उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलला स्थान मिळावे ही अनेक वर्षापासूनची गझलकारांची मागणी होती. परंतु तिला वेगळे स्थान संमेलनात आजतागायत देण्यात आले नव्हते. पण ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच ‘गझल’ या काव्यप्रकाराला स्थान मिळाले. त्यामुळे गझलकारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. गझलकार सुरेश भट यांनी गेल्या ५० वर्षापासून गझलचा प्रचार करायला सुरूवात केली होती. गझलची वेगळी संमेलने होत असली तरी तिचा रदीफ आणि काफिला हा वेगळा असतो. म्हणून तिला साहित्य संमेलनात वेगळे स्थान मिळावे अशी सुरेश भट यांची मागणी होती. त्यानंतरही अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

आजपर्यंतची साहित्य संमेलन ही केवळ ‘कविता’ या प्रकारात भोवतीच फिरत होती. ९० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गझलकार शर्वरी मुनीश्वर, प्रशांत वैद्य, प्रा. अरूणोदय भाटकर यांनी गझलाला संमेलनात स्थान मिळावे अशी सूचना आयोजक आगरी युथ फोरमकडे केली होती. त्यानुसार तिला संमेलनात स्थान देण्यात आले आहे. 

अनिल आठल्यकरे यांनी ‘‘अप्राप्य कोटीचे असे दुर्भाग्य आहे हे , तुझ्या नजरेत आहे पण, तुझ्या कक्षेत नाही ’’या गझल ने झाली. वर्षा बेडगीर यांनी गाठला मुक्काम पण, सोडविना पालखी ही गझल सादर केली. दुसऱ्या सत्रात प्रशांत जामदार यांच्या देइल स्वराज्य नक्की, माझीच बंडखोरी, माझ्यातला शिवाजी आगऱ्यात बसत नाही या मुशायिराने झाली. जयदीप जोशी यांनी ‘‘नवा रस्ता निवडल्यावर असे होते, प्रशंसा व्हायच्या आधी हसे होते’’ तिसऱ्या सत्रात संतोष घुले यांनी ‘‘श्रध्दा, भक्ती, प्रेम तुम्हावर, तिला पाहूनिया गझल लिहिल्या मी साऱ्या’’ आणि शब्द शब्द आठवत लिहिलं रोज तिच्यावर गझल नवी ही गझल सादर केली.

वसईवरून आलेल्या शिल्पा परूळेकर यांनी ‘आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले’ ही गझल सादर करताच पे्रक्षकांनी वाह क्या बात है ची दाद दिली. पुण्याहून आलेल्या श्वेता द्रविड यांनी झळा सोसण्याची तुझी जात नाही. दे्रवेंद्र गाडेकर द्वेष, मत्सर, क्र ोध सारे दूर करूया आपल्या देहास पंढरपूर, गोष्ट छोटी पण तिने कादंबरी केली. आत्महत्येची लिहून ठेवली चिठ्ठी, सर्व दुखाने खुशीने सही केली हे शेर सादर केले. त्यानंतर त्यांनी पोरकी झालीस तु इतकेच आठवते, हरली नाहीस तु एवढेच आठवते ही गझल सादर करून प्रेक्षकांची टाळ््याच्या कडकडाटात दाद मिळविली. प्रशांत जामदार यांनी निवडून मला तू जिंकली पाहिजे, लोकशाही आता संपली पाहिजे हा शेर सादर केला. आनंद रघुनाथ यांनी ‘अश्या ही किर्र अंधारात सोबत सावली आहे ’ही गझल सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली.

साहित्य संमेलनात काव्यवाचनाला तीन दिवसात २८ तासांचा वेळ देण्यात आला आहे. गझलकट्टयात सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले . प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी गझलला स्वतंत्र व्यासपीठ देण्यात आल्याचे समितीचे प्रशांत वैद्य यांनी सांगितले आहे.