शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोरगरीब भक्तांचा पांडुरंग झाला कोट्यधीश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:13 IST

आषाढी वारी काळात मिळाले ४ कोटी ४० लाखांचे उत्पन्न; गतवर्षीपेक्षा दीड कोटी उत्पन्न जास्त

ठळक मुद्देआषाढी यात्रा काळात भाविकांनी विठ्ठलचरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दानरुक्मिणीमातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान अर्पण केले यंदा उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली

प्रभू पुजारी

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, गोरगरिबांचे श्रद्धास्थान पांडुरंग आषाढी वारी काळात मिळालेल्या देणग्यांमुळे कोट्यधीश झाला  आहे.

आषाढी वारी काळात म्हणजेच ३ ते १७ जुलैदरम्यान लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले़ आषाढीच्या १५ दिवसांच्या कालावधीत मंदिरे समितीला विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात १ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी यात्रा काळात भाविकांनी विठ्ठलचरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दान तर रुक्मिणीमातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान अर्पण केले आहे. 

देणगी स्वरुपातून १ कोटी ८४ लाख ५४ हजार ९१ रुपये, बुंदी व राजगिरा लाडू प्रसादाच्या विक्रीतून ७२ लाख ४६ हजार २१० रुपये, नव्याने बांधलेल्या श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवासाच्या माध्यमातून १८ लाख ९१ हजार, वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास ३ लाख ५० हजार ४०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ २०१८ मध्ये आषाढी वारी काळात हे दान २ कोटी ९० लाख रुपये होते.

स्वयंसेवकांची सेवाआषाढी वारी काळात भारत सेवाश्रम (कोलकात्ता), वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई), कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट (कराड), रेडक्रॉस सोसायटी, हरित वारी परिवार, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज यासह अन्य संस्थांनी वैद्यकीय सुविधा, पाणी वाटप, स्वच्छता, देणगी जमा करण्याकामी मदत आदी सेवा बजावल्या होत्या.

यामुळे वाढले उत्पन्ऩ़़आषाढी वारी काळात मंदिरे समिती व प्रशासनाने वारकºयांच्या सोयीसाठी ६५ एकर परिसरात ३ लाख वारकºयांच्या निवासाची सोय केली. नदीपात्रात ७० टक्के भाग रिकामा ठेवला. त्यामुळे वारकºयांना स्रान केल्यानंतर वाळवंटात भ्रमण करण्याचा व नौकाविहाराचा आनंद घेता आला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत एसडीआरएफचे जवान तैनात केले होते. दर्शन रांगेत भाविकांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून ग्रीन कार्पेट मॅटिंग टाकले होते. दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था केली होती. दर्शन रांगेतील भाविकांना चहा, पाणी, फराळ व अन्नदान केले होते. भाविकांना अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यानेच भाविकांनीही पांडुरंगचरणी भरभरून दान दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी