शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराच्या पैशांतून उभारले उद्यान

By admin | Updated: May 7, 2017 06:25 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळविलेल्या नवी मुंबई महापालिकेस यापूर्वी तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये पुरस्कार मिळविलेल्या नवी मुंबई महापालिकेस यापूर्वी तीन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराच्या १ कोटी ५ लाख रुपयांतून नेरुळमधील टेकडीवर संत गाडगेबाबा उद्यान उभारण्यात आले असून, या उद्यानाला सहा वर्षांमध्ये तब्बल १० लाख ९८ हजार नागरिकांनी भेट दिली आहे. महाराष्ट्र शासनाने २००२मध्ये संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केले होते. पहिल्याच वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. यासाठी सन्मानचिन्ह व ५० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. २००५-६ या आर्थिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेमध्येही महापालिकेने सहभाग घेतला व पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला. यावर्षीही ५० लाख रुपयांचे बक्षीस पालिकेस मिळाले. २००८-९ या वर्षामध्येही ५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार पालिकेस देण्यात आला. पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेल्या १ कोटी ५ लाख रुपये बक्षिसाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्मारक व उद्यान उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नेरुळ रेल्वेस्टेशन समोर आयुक्त निवासाच्या बाजूच्या ओसाड टेकडीची यासाठी निवड करण्यात आली. वर्षानुवर्षे कचराकुंडी बनलेल्या या भूखंडावर अत्यंत कमी खर्चामध्ये उद्यान उभारून त्याला संत गाडगेबाबा उद्यान नाव देण्यात आले. ११ जानेवारी २०११मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शहरवासीयांसाठी सर्वात मोठे व तिकीट आकारण्यात आलेले हे पहिले उद्यान ठरले. उद्यानामध्ये औषधी वनस्पती, वाद्य संस्कृती, आश्मयुगीन गुंफा, शेतकरी पुतळे उभारण्यात आले. आकर्षक बैठक व्यवस्था विस्तीर्ण जॉगिंग ट्रॅक व मुलांसाठी खेळण्यासाठी टॉयट्रेनसह इतर गोष्टींचा समावेश करण्यात आला. यामुळे बेलापूर ते ऐरोलीपर्यंतच्या नागरिक उद्यानाला भेट देऊ लागले. गाडगेबाबा उद्यानामध्ये सहा वर्षांमध्ये ५ ते १२ वर्षे वयोगटातील २ लाख ५८ हजार ४०७ नागरिकांनी भेट दिली आहे. १२ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ८ लाख ३८ हजार ९८८ नागरिकांनी भेट दिली आहे. उन्हाळ्याची सुटी असल्याने रोज १ हजारपेक्षा जास्त नागरिक उद्यानास भेट देत आहेत. उद्यानामध्ये संत गाडगेमहाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. नागरी स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारामधून राज्यात उभारण्यात आलेले हे एकमेव उद्यान आहे. यामुळे पुरस्काराच्या पैशांचाही सदुपयोग झाला व ओसाड टेकडीचे चांगल्या उद्यानामध्ये रूपांतर होऊ शकले आहे. कॅफेटेरिया बंदच उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी करता याव्या, यासाठी कॅफेटेरियासाठी बांधकाम केले आहे; परंतु प्रत्यक्षात सहा वर्षे झाल्यानंतरही ते सुरू करण्यात आलेले नाही. नागरिकांना पिण्यासाठी पाणीही घरून आणावे लागत असून उद्यानाच्या बाहेर जादा दराने खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत. कॅफेटेरिया कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कमी खर्चात उभारले उद्यान संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पैशांतून उद्यान विकसित करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त विजय नाहटा व लोकप्रतिनिधींनी घेतला. शहर अभियंता मोहन डगावकर, तत्कालीन उपआयुक्त जगन्नाथ सिन्नकर यांनी परिश्रम घेऊन उद्यानाची उभारणी केली असून या माध्यमातून पुरस्काराच्या पैशांचा विनियोग कसा करावा, याविषयी आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. शहरातील इतर उद्यानांच्या तुलनेमध्ये कमी खर्चात हे उद्यान उभारण्यात आले आहे. खुले संग्रहालय उभारावेउद्यानाचा भूखंड विस्तीर्ण आहे; परंतु येथे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी साधनेच नाहीत. टॉय ट्रेन व इतर उद्यानांमध्ये असतात तेवढीच खेळणी येथेही आहेत वास्तविक येथे औषधी वनस्पती व त्यांचे गुणधर्म सांगणारे किंवा महापुरूषांची स्मारके उभारून त्यांची माहिती देणारे खुले संग्रहालय उभारणे शक्य असून पालिका प्रशासनाने विकासकामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.