शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

कचरा वेचणाऱ्यांचा होणार सन्मान

By admin | Updated: June 11, 2015 08:51 IST

देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही. मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट

मुंबई : देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही. मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाट लावण्यात फार मोलाची भूमिका बजावली. त्यांचे कार्य अतुलनीय असून त्याची दखल घेत पुढील वर्षापासून कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. दररोज जमा होणाऱ्या १५ हजार टन कचऱ्यापैकी फक्त ९ हजार टन कचरा उचलला जातो. ही समस्या सोडविण्यासाठी कचरा विल्हेवाटीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. शहरी भागाप्रमाणेच ३ हजार व त्यापेक्षा अधिक लोकवस्तीच्या गावांनाही कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियम लागू करण्यात येणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी जमा होणारा कचरा वेळेत उचलणे आवश्यक आहे. शिवाय या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पारंपरिक कचऱ्याच्या जोडीला ई-कचरा, प्लॅस्टिक कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. कचऱ्याची जैविक, औद्योगिक, मेटल, बायोमेडिकल वेस्ट, ई-कचरा आदी प्रकारचे वर्गीकरण केले जाईल. नद्यांमध्ये यातील ८० टक्के कचरा प्रक्रिया न करता सोडला जातो. शिवाय २ हजार ३०० उद्योग त्यात भर घालतात. या उद्योगातून नदीत प्रदूषित पाणी सोडले जाणार नाही, याच्या तपासणीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. साखर व डिस्टिलरी उद्योगांना झीरो वॉटर डिस्चार्ज लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)