शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

माथाडींमध्ये टोळी वॉर

By admin | Updated: June 13, 2016 03:06 IST

एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोन्ही टोळीतील काही कामगारांना अटक केली आहे. कामाची आॅर्डर मिळालेल्या टोळीव्यतिरिक्त दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे कामगारांमध्ये वाद होवून हा प्रकार घडला.एपीएमसी मार्केटमध्ये वाराईचे काम मिळवण्यावरून कामगारांमध्ये हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे मार्केट आवारात कामगारांमध्येच टोळी वॉर पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्याच दोन टोळ्यांमध्ये गुरुवारी दुपारी जबर हाणामारी झाली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीतील कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका टोळीला ग्रोसरी बोर्डाकडून वाराईची आॅर्डर मिळालेली असताना, त्या टोळीने दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे हा प्रकार घडला. कामगारांच्या सदर टोळ्यांमध्ये काही दिवसांपासून वाराईच्या कामावरून वाद सुरू होता. परंतु माथाडीच्या एकाही नेत्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनेच त्यांनी योग्य न्याय निवाडा केला होता. त्यानंतरही एका टोळीने वाराईच्या कामावर आपलाच अधिकार असल्याचे सांगत त्याठिकाणी काम करणाऱ्या टोळीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात दोन्ही बाजूने सुमारे ४०० ते ५०० कामगारांचा जमाव जमून गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.ग्रोसरी बोर्डाकडून माथाडींच्या ५०३९ क्रमांकाच्या टोळीला दाणा बंदरमधील एफ १९ क्रमांकाच्या गाळ्यातील वाराईच्या कामाची आॅर्डर मिळालेली. परंतु काही कारणाने त्यांची आॅर्डर रद्द करून ४२२५ क्रमांकाच्या टोळीला ती देण्यात आली. यानुसार ४२२५ क्रमांकाच्या टोळीने त्याठिकाणी वाराईचे काम करणे आवश्यक असतानाही या टोळीकडून ४२५८ क्रमांकाच्या टोळीला परस्पर त्याठिकाणी काम देण्यात आले. परंतु हा प्रकार धोरणाच्या विरुध्द असल्यामुळे ५०३९ क्रमांकाच्या टोळीतील कामगारांनी पोलिसांच्या मध्यस्थीने त्याठिकाणी कामाचा अधिकार मिळवला. यानुसार गुरुवारी संध्याकाळी सदर टोळीतले कामगार त्याठिकाणी काम करताना ४२५८ क्रमांकाच्या टोळीचे कामगार देखील त्याठिकाणी आल्यामुळे त्यांच्यात वाद होवून जबर हाणामारी झाली.>पालकमंत्र्यांची भेट घेणार!एकाच युनियनच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होवूनही माथाडींच्या नेत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. माथाडी कामगारांचा एक गट लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे समजते. वाद मिटवण्याऐवजी वाढावा यासाठी ठरावीक टोळ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचाही संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. ज्या टोळ्यांमध्ये नेतेमंडळी आहेत, त्याच टोळ्यांना अधिक काम मिळावे यासाठी सर्व खटाटोप होत असल्याची देखील चर्चा आहे.