शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

माथाडींमध्ये टोळी वॉर

By admin | Updated: June 13, 2016 03:06 IST

एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोन्ही टोळीतील काही कामगारांना अटक केली आहे. कामाची आॅर्डर मिळालेल्या टोळीव्यतिरिक्त दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे कामगारांमध्ये वाद होवून हा प्रकार घडला.एपीएमसी मार्केटमध्ये वाराईचे काम मिळवण्यावरून कामगारांमध्ये हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे मार्केट आवारात कामगारांमध्येच टोळी वॉर पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्याच दोन टोळ्यांमध्ये गुरुवारी दुपारी जबर हाणामारी झाली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीतील कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका टोळीला ग्रोसरी बोर्डाकडून वाराईची आॅर्डर मिळालेली असताना, त्या टोळीने दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे हा प्रकार घडला. कामगारांच्या सदर टोळ्यांमध्ये काही दिवसांपासून वाराईच्या कामावरून वाद सुरू होता. परंतु माथाडीच्या एकाही नेत्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनेच त्यांनी योग्य न्याय निवाडा केला होता. त्यानंतरही एका टोळीने वाराईच्या कामावर आपलाच अधिकार असल्याचे सांगत त्याठिकाणी काम करणाऱ्या टोळीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात दोन्ही बाजूने सुमारे ४०० ते ५०० कामगारांचा जमाव जमून गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.ग्रोसरी बोर्डाकडून माथाडींच्या ५०३९ क्रमांकाच्या टोळीला दाणा बंदरमधील एफ १९ क्रमांकाच्या गाळ्यातील वाराईच्या कामाची आॅर्डर मिळालेली. परंतु काही कारणाने त्यांची आॅर्डर रद्द करून ४२२५ क्रमांकाच्या टोळीला ती देण्यात आली. यानुसार ४२२५ क्रमांकाच्या टोळीने त्याठिकाणी वाराईचे काम करणे आवश्यक असतानाही या टोळीकडून ४२५८ क्रमांकाच्या टोळीला परस्पर त्याठिकाणी काम देण्यात आले. परंतु हा प्रकार धोरणाच्या विरुध्द असल्यामुळे ५०३९ क्रमांकाच्या टोळीतील कामगारांनी पोलिसांच्या मध्यस्थीने त्याठिकाणी कामाचा अधिकार मिळवला. यानुसार गुरुवारी संध्याकाळी सदर टोळीतले कामगार त्याठिकाणी काम करताना ४२५८ क्रमांकाच्या टोळीचे कामगार देखील त्याठिकाणी आल्यामुळे त्यांच्यात वाद होवून जबर हाणामारी झाली.>पालकमंत्र्यांची भेट घेणार!एकाच युनियनच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होवूनही माथाडींच्या नेत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. माथाडी कामगारांचा एक गट लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे समजते. वाद मिटवण्याऐवजी वाढावा यासाठी ठरावीक टोळ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचाही संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. ज्या टोळ्यांमध्ये नेतेमंडळी आहेत, त्याच टोळ्यांना अधिक काम मिळावे यासाठी सर्व खटाटोप होत असल्याची देखील चर्चा आहे.