शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

माथाडींमध्ये टोळी वॉर

By admin | Updated: June 13, 2016 03:06 IST

एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : एकाच युनियनच्या दोन माथाडी कामगार टोळ्यांमध्ये जबर हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी दोन्ही टोळीतील काही कामगारांना अटक केली आहे. कामाची आॅर्डर मिळालेल्या टोळीव्यतिरिक्त दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे कामगारांमध्ये वाद होवून हा प्रकार घडला.एपीएमसी मार्केटमध्ये वाराईचे काम मिळवण्यावरून कामगारांमध्ये हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे मार्केट आवारात कामगारांमध्येच टोळी वॉर पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्याच दोन टोळ्यांमध्ये गुरुवारी दुपारी जबर हाणामारी झाली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन्ही टोळीतील कामगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका टोळीला ग्रोसरी बोर्डाकडून वाराईची आॅर्डर मिळालेली असताना, त्या टोळीने दुसऱ्या टोळीला काम दिल्यामुळे हा प्रकार घडला. कामगारांच्या सदर टोळ्यांमध्ये काही दिवसांपासून वाराईच्या कामावरून वाद सुरू होता. परंतु माथाडीच्या एकाही नेत्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनेच त्यांनी योग्य न्याय निवाडा केला होता. त्यानंतरही एका टोळीने वाराईच्या कामावर आपलाच अधिकार असल्याचे सांगत त्याठिकाणी काम करणाऱ्या टोळीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरात दोन्ही बाजूने सुमारे ४०० ते ५०० कामगारांचा जमाव जमून गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.ग्रोसरी बोर्डाकडून माथाडींच्या ५०३९ क्रमांकाच्या टोळीला दाणा बंदरमधील एफ १९ क्रमांकाच्या गाळ्यातील वाराईच्या कामाची आॅर्डर मिळालेली. परंतु काही कारणाने त्यांची आॅर्डर रद्द करून ४२२५ क्रमांकाच्या टोळीला ती देण्यात आली. यानुसार ४२२५ क्रमांकाच्या टोळीने त्याठिकाणी वाराईचे काम करणे आवश्यक असतानाही या टोळीकडून ४२५८ क्रमांकाच्या टोळीला परस्पर त्याठिकाणी काम देण्यात आले. परंतु हा प्रकार धोरणाच्या विरुध्द असल्यामुळे ५०३९ क्रमांकाच्या टोळीतील कामगारांनी पोलिसांच्या मध्यस्थीने त्याठिकाणी कामाचा अधिकार मिळवला. यानुसार गुरुवारी संध्याकाळी सदर टोळीतले कामगार त्याठिकाणी काम करताना ४२५८ क्रमांकाच्या टोळीचे कामगार देखील त्याठिकाणी आल्यामुळे त्यांच्यात वाद होवून जबर हाणामारी झाली.>पालकमंत्र्यांची भेट घेणार!एकाच युनियनच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी होवूनही माथाडींच्या नेत्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. माथाडी कामगारांचा एक गट लवकरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे समजते. वाद मिटवण्याऐवजी वाढावा यासाठी ठरावीक टोळ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचाही संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. ज्या टोळ्यांमध्ये नेतेमंडळी आहेत, त्याच टोळ्यांना अधिक काम मिळावे यासाठी सर्व खटाटोप होत असल्याची देखील चर्चा आहे.