शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:35 IST

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे.

मुंबई-गोवा रस्त्याची हालत १५ हजार कोटी रुपये खर्चूनसुद्धा खराब असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतू, ही टोलमाफी वेळेवर मिळणार का, असा सवाल गणेशभक्तांकडून विचारला जात आहे. 

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी अशीच महिना-दोन महिने आधी गणेशभक्तांना टोलमाफीची घोषणा केली होती. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी राज्य शासनाने जीआर काढला होता. यामुळे अनेक वाहनचालकांना बिनापासच टोल भरत जावे लागले होते. यंदा त्याहून वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता फारच कमी आहे. 

कारण गणेश चतुर्थी यंदा १९ सप्टेंबर, मंगळवारी येत आहे. यामुळे गणेशभक्त कोकणात १५ सप्टेंबर, शुक्रवारपासूनच जायला सुरुवात करणार आहेत. सोमवारी, १८ सप्टेंबरलाच हरतालिका आहे. यामुळे कोकणात जाणारे गणेशभक्त शुक्रवार दुपारपासूनच गावी जाण्यासाठी निघणार आहेत. यामुळे जर सरकारने पास वेळीच जारी केले नाहीत तर या सर्वांना टोल भरत जावे लागणार आहे. 

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. यामुळे राज्य सरकारने १३, १४ सप्टेंबरपासूनच आरटीओकडून पास देण्यास सुरुवात करावी अशी मागणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पुण्यातील गणेशभक्तांकडून होत आहे. 

मोफत एसटी बसही... 

महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. ट्रेन तीन महिने आधीच फुल झालेल्या आहेत. यामध्ये प्रचंड अनागोंदी झाल्याचा आरोप सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यामुळे गणेशभक्तांना एसटी बसचाच काय तो आधार असणार आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवtollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे