शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

गणेशोत्सवाला कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय; पण पास कधी देणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 14:35 IST

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे.

मुंबई-गोवा रस्त्याची हालत १५ हजार कोटी रुपये खर्चूनसुद्धा खराब असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. परंतू, ही टोलमाफी वेळेवर मिळणार का, असा सवाल गणेशभक्तांकडून विचारला जात आहे. 

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी अशीच महिना-दोन महिने आधी गणेशभक्तांना टोलमाफीची घोषणा केली होती. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी राज्य शासनाने जीआर काढला होता. यामुळे अनेक वाहनचालकांना बिनापासच टोल भरत जावे लागले होते. यंदा त्याहून वेगळी परिस्थिती असण्याची शक्यता फारच कमी आहे. 

कारण गणेश चतुर्थी यंदा १९ सप्टेंबर, मंगळवारी येत आहे. यामुळे गणेशभक्त कोकणात १५ सप्टेंबर, शुक्रवारपासूनच जायला सुरुवात करणार आहेत. सोमवारी, १८ सप्टेंबरलाच हरतालिका आहे. यामुळे कोकणात जाणारे गणेशभक्त शुक्रवार दुपारपासूनच गावी जाण्यासाठी निघणार आहेत. यामुळे जर सरकारने पास वेळीच जारी केले नाहीत तर या सर्वांना टोल भरत जावे लागणार आहे. 

सरकारचा निर्णय जरी दिलासा देणारा असला तरी तो उशिराने जाणाऱ्या मोजक्या वाहनचालांकान फायद्याचा ठरणार आहे. यामुळे राज्य सरकारने १३, १४ सप्टेंबरपासूनच आरटीओकडून पास देण्यास सुरुवात करावी अशी मागणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पुण्यातील गणेशभक्तांकडून होत आहे. 

मोफत एसटी बसही... 

महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. ट्रेन तीन महिने आधीच फुल झालेल्या आहेत. यामध्ये प्रचंड अनागोंदी झाल्याचा आरोप सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यामुळे गणेशभक्तांना एसटी बसचाच काय तो आधार असणार आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवtollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदे