वर्धा : सेवाग्राम आश्रमला २०१९मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहे. या वर्षापर्यंत ‘गांधी फॉर टुमारो’ पूर्णत्वास आणण्याचा आपला प्रयत्न आहे. या दृष्टीने सेवाग्राम आश्रम विकास आराखडा हा साबरमतीच्या धर्तीवर आणि सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही राज्याचे वित्त मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिली. गांधी जयंतीनिमित्त त्यांनी सेवाग्राम आश्रमला भेट दिली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. साबरमतीला जाऊन तेथील विकासाचे मॉडेल बघणार आहे. त्याच धर्तीवर सेवाग्राम आश्रम विकास आराखडा तयार करण्यात येईल, या अनुषंगाने मुंबईला लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.प्रकल्प साकारण्यासाठी निधी मिळावा म्हणून केंद्राकडेही प्रयत्न करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)
वर्धा येथे २०१९ पर्यंत ‘गांधी फॉर टुमारो’
By admin | Updated: October 3, 2015 03:26 IST