शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

कुठलेही प्रशिक्षण न घेता जळगावच्या महिला उद्योजकांची गगन भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:52 IST

जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योगांनी गगन भरारी घेतली आहे. यात महिला उद्योजकही मागे नाहीत, यापैकी अनेकांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योगात यश मिळविले आहे.

- चुडामण बोरसेजळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योगांनी गगन भरारी घेतली आहे. यात महिला उद्योजकही मागे नाहीत, यापैकी अनेकांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योगात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक महिला उद्योजकांनी कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही, तरीही त्यांच्या उद्योगाची यशाकडे वाटचाल सुरु आहे.प्रा. संजय वसंत भामरे यांनी ‘जळगाव जिल्ह्यातील महिला उद्योजकांच्या समस्यांचा अभ्यास’ याविषयावर पीएच.डी. मिळविली आहे. प्रा.भामरे हे जळगावच्या कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यासाठी त्यांना महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या डॉ. मंगला जंगले यांचे मार्गदर्शन मिळाले. या शोध निबंधासाठी जिल्ह्यात कार्यरत महिला उद्योजकांपैकी १६० महिला उद्योजकांचा हा सॅम्पल सर्वे करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात अनेक मोठे, मध्यम आणि लघुउद्योग सुरु झाले. लक्ष्मी नारखेडे ह्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला उद्योजक. त्यांनी सन १९७० मध्ये आपल्या उद्योगाची सुरुवात केली. यानंतर अनेक महिला उद्योजक या क्षेत्रात आल्या आहेत.जिल्ह्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार महिलांची संख्या २०.३२ लाख होती. पुढे महिला शिक्षणाचे प्रमाण वाढले. नियमित शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण देणाºया संस्था वाढल्या. औद्यागिक शहराच्या तुलनेत महिला उद्योजकांचे प्रमाण १६.४२ टक्के इतके कमी आहे. जिल्ह्यात सन १९९० नंतर महिला उद्योजकांच्या संख्येत वाढली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १९९९ पासून बचत गट स्थापन करण्यात आले. या बचत गटामार्फत विविध वस्तूंची निर्मिती होऊ लागली. जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी उद्योग उभे राहिले आहेत. त्यात ४,२८२ सूक्ष्म उद्योग, ५२६ लघुउद्योग, १६ मध्यम आणि १६ मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. यात पदवीधर महिला उद्योजकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे महिला उद्योजकांमध्ये संयुक्त कुटुंब असलेल्या उद्योजकांचे प्रमाण जास्त आहे.पतीचे पाठबळ आणि प्रेरणा असेल तर महिला उद्योजक कुठलीही जोखीम घेण्यास तयार असतात. सॅम्पल सर्वे करण्यात आलेल्या महिला उद्योजकांपैकी निम्म्या उद्योजकांनी कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतले नसल्याचे आढळून आले आहे. बाजारपेठेत उत्पादनांची विक्री करताना महिला उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.महिला उद्योजकांना उद्योग अथवा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात स्वत:ची जागा, औद्योेगिक वसाहत किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीकडून जागा उपलब्ध होते. स्वत:ची जागा असेल तर अडचणी येत नाहीत. पण इतर ठिकाणी जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील महिला उद्योजकांच्या उद्योगांविषयी माहिती एकत्र करुन ही माहिती संकलित करण्यात आली आहे. सांख्यिकी आणि वर्णनात्मक माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती.महिला उद्योजकांच्या उत्पादनाला वाव मिळावा आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारनेच उत्पादन विकत घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, यामुळे या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होईल. तसेच उद्योगाला अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि वीजेचे दर कमी केल्यास या महिला उद्योजकांना नक्कीच मदत होणार आहे.- प्रा.संजय वसंत भामरे, संशोधक.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव