शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:52 IST

मुंबई-गोवा हायवेचे बांधकाम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले आहेत. जवळपास गेली १६-१७ वर्षे या महामार्गाचे कामच सुरु आहे.

गेली कित्येक वर्षे नितीन गडकरी केंद्रात मंत्री आहेत, ते पण रस्ते परिवाहन आणि राजमार्ग खात्याचे, तरीही त्यांना महाराष्ट्रातील मुंबई-गोवा महामार्ग काही केल्या पूर्ण करता आलेला नाहीय, अशी टीका विरोधकांकडून होते. आता त्यांनी हा महामार्ग पूर्ण होण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. यामुळे या महामार्गाबाबत आशा सोडलेल्या कोकणवासियांनी पुन्हा आशा करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई-गोवा हायवेचे बांधकाम येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले आहेत. जवळपास गेली १६-१७ वर्षे या महामार्गाचे कामच सुरु आहे. राजकारण्यांचे हस्तक्षेप, कोर्टात गेलेले खटले, कंत्राटदार पळून जाणे अशी अनेक विघ्ने या महामार्गावर कोसळली आहेत. कुठे एकेरी, तर कुठे दोन्ही बाजुला खड्डेच खड्डे अशी परिस्थिती या महामार्गाची आहे. ज्याला कंबरदुखी, मानदुखी असेल त्याची कंबरदुखी मानदुखी गायब होईल आणि ज्याची नाही त्याला कंबरदुखी मानदुखी सुरु होईल असा हा महामार्ग आहे. 

अनेकांचे या महामार्गाने बळी घेतलेले आहेत. अनेक गावांतील कर्ते पुरुष या महामार्गाने संपविले आहेत. प्रशासन फक्त पंचनामे आणि गुन्हे यापुढे काहीही करत नाहीय, अशी कोकणातील या रस्त्याची परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी गडकरींनीच हवाई पाहणी केली होती. आता त्यांनी या महामार्गाकडे लक्ष दिले असून येत्या जूनपर्यंत हा हायवे तयार होईल असा त्यांनी दावा केला आहे. 

सोमवारी मुंबईतील दादर परिसरात 'अमर हिंद मंडळ'ने आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत गडकरी यांनी ही घोषणा केली. केंद्र सरकार नवीन टोल धोरणावर काम करत आहे, ते लवकरच लागू केले जाणार आहे. यामुळे टोलनाके हटविले जातील, असे ते म्हणाले. पुढील दोन वर्षांत भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील, असेही ते म्हणाले. 

मुंबई आणि गोवा दरम्यान बांधण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गामुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. हा महामार्ग पूर्ण करण्यात अनेक अडथळे आले. जमीन अधिग्रहण, न्यायालयीन खटले आणि भरपाईशी संबंधित गुंतागुंतीवरून भावांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहामुळे काम अडकलेले होते. आता या सर्व समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि कामाला वेग आला आहे, असे ते म्हणाले. येत्या जूनपर्यंत हा रस्ता १०० टक्के पूर्ण होईल असे त्यांना सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoaगोवा