शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

राज्यपालांवर गाडगेबाबांचे गारुड

By admin | Updated: August 15, 2015 00:24 IST

महाराष्ट्राला स्वच्छता आणि पुरोगामी विचाराचे देणे देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मनावर गारूड केले आहे.

-  संदीप प्रधान,  मुंबईमहाराष्ट्राला स्वच्छता आणि पुरोगामी विचाराचे देणे देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मनावर गारूड केले आहे. गाडगेबाबांवर तेलगु भाषेत पुस्तकाचे लेखन राव यांनी सुरु केले असून त्यांचे तीन पुतळे तयार करून घेण्याचे राज्यपालांनी ठरवले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियानह्ण सुरु केल्यानंतर अमरावती येथील विद्यापीठास भेट दिली असता राव यांना गाडगेबाबांचे इंग्रजी चरित्र त्यांना भेट देण्यात आले. त्याचे वाचन केल्यावर राज्यपाल राव यांच्यावर गाडगेबाबांचा स्वच्छतेचा ध्यास, त्यांचे अंधश्रद्धा विरोधी काम याने गारूड केले. गाडगेबाबांशी संबंधित वेगवेगळे संदर्भ गोळा करून राज्यपालांनी तेलगु भाषेत चरित्र लिहिण्यास सुरुवात केली आहे. गाडगेबाबांचा मुंबईत कुठे पुतळा आहे का, याचा शोध राज्यपालांनी घेतला असता असा पुतळा नसल्याचे त्यांना समजले. फार पूर्वी मुंबईतील धोबीतलाव येथे गाडगेबाबांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र त्यानंतर एक दिवस तो अचानक गायब झाला, अशी माहिती मिळाली. सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या पुरोगामी व्यक्तीचा पुतळा तयार करवून बसवण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी मुंबईतील व तेलंगणातील अशा दोन शिल्पकारांना राजभवनावर बोलावून गाडगेबाबांचे तीन पुतळे तयार करून घेण्याबाबत चर्चा केली. हे तीन पुतळे कुठे बसवायचे याबाबत राज्यपालांनी अजून स्पष्टीकरण दिलेले नाही. राज्यपाल राव यांचे ‘उनिकी’ (अस्तित्व) हे पुस्तक यापूर्वी प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये तेलंगणाचे आंदोलन, लालकृष्ण अडवाणी यांच्या ‘माय कंट्री माय लाईफ’ चरित्रग्रंथाची समीक्षा अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे.