शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

भावी सैनिकांच्या स्वप्नांना जमिनीचं अंथरूण अन् आकाशाचं पांघरूण!

By admin | Updated: February 10, 2015 00:03 IST

हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले.

रत्नागिरी : रत्नागिरीत ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागांसाठीच्या सैन्यदल भरतीबाबत नियोजनात अनेक त्रुटी असल्याने सैन्यात भरती होण्यास आलेल्या हजारो उमेदवारांना राहण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे मारुती मंदिर परिसरातील रस्ते, क्रीडांगणाच्या भोवतीचा परिसर व व्यावसायिक संकुलांच्या आवारात वास्तव्य करण्याची वेळ शेकडो उमेदवारांवर आली आहे.८ फेब्रुवारी २०१५ रोजी सैन्य भरतीला सुरुवात झाली असून, प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी शिवाजी स्टेडियममध्ये भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी आज सोलापूर येथील सात हजारांवर उमेदवारांनी भरती प्रक्रियेत हजेरी लावली. हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले. अनेक उपाहारगृहातील खाद्यपदार्थ संपल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मारुती मंदिर परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. परंतु सैन्यभरतीसाठी एवढ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याची साधी कल्पनाही त्यांना नाही. त्यामुळे हॉटेल्समधील खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणेच राहिल्याने या शेकडो उमेदवारांना जेवण, नाश्ताही मिळाला नाही. पाण्याचेही हाल झाले. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शिवाजी स्टेडियमच्या मागील भागात असलेल्या बहुउद्देशीय संकुलातील व्यावसायिक गाळे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्य काही ठिकाणीही त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही निवास व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेकडो उमेदवारांना मारुती मंदिर सर्कलमध्ये उघड्या आभाळाखाली पांघरूण घेऊन झोपावे लागले.त्यामुळे भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांचे हाल झाले. (प्रतिनिधी)उमेदवार संख्या लाखावर जाणार!१० फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यातीलच उमेदवार सैन्य भरतीसाठी येणार आहेत. त्यामुळे यादिवशी उमेदवारांची फारशी गैरसोय होण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी ११ रोजी कोल्हापूर, १३ला सांगली, १४ला गोवा, १५ला सातारा, १६, १७ला उर्वरित महाराष्ट्र, गुजरात व गोव्याच्या उमेदवारांची भरती होणार आहे. या ठिकाणांहून प्रत्येक दिवशी सुमारे १० हजारांच्यावर उमेदवार सैन्य भरतीसाठी रत्नागिरीत येण्याचा अंदाज जिल्हा सैनिक कल्याण विभागाने व्यक्त केला आहे. भरतीकाळात येणाऱ्या उमेदवारांची ही संख्या लाख ते दीड लाखांवर जाण्याची शक्यता लक्षात घेता या तरुणांची निवास व्यवस्था कशी काय होणार, याचे नियोजन अजूनही करण्यास वाव आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार येऊनही त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली नाही तर उद्यानात वास्तव्य करणे व प्रात:विधी उरकणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिक कल्याण विभागाने सतर्क राहाणे गरजेचे आहे.