शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

भावी सैनिकांच्या स्वप्नांना जमिनीचं अंथरूण अन् आकाशाचं पांघरूण!

By admin | Updated: February 10, 2015 00:03 IST

हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले.

रत्नागिरी : रत्नागिरीत ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागांसाठीच्या सैन्यदल भरतीबाबत नियोजनात अनेक त्रुटी असल्याने सैन्यात भरती होण्यास आलेल्या हजारो उमेदवारांना राहण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे मारुती मंदिर परिसरातील रस्ते, क्रीडांगणाच्या भोवतीचा परिसर व व्यावसायिक संकुलांच्या आवारात वास्तव्य करण्याची वेळ शेकडो उमेदवारांवर आली आहे.८ फेब्रुवारी २०१५ रोजी सैन्य भरतीला सुरुवात झाली असून, प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी शिवाजी स्टेडियममध्ये भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी आज सोलापूर येथील सात हजारांवर उमेदवारांनी भरती प्रक्रियेत हजेरी लावली. हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले. अनेक उपाहारगृहातील खाद्यपदार्थ संपल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मारुती मंदिर परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. परंतु सैन्यभरतीसाठी एवढ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याची साधी कल्पनाही त्यांना नाही. त्यामुळे हॉटेल्समधील खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रमाण नेहमीप्रमाणेच राहिल्याने या शेकडो उमेदवारांना जेवण, नाश्ताही मिळाला नाही. पाण्याचेही हाल झाले. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शिवाजी स्टेडियमच्या मागील भागात असलेल्या बहुउद्देशीय संकुलातील व्यावसायिक गाळे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्य काही ठिकाणीही त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही निवास व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेकडो उमेदवारांना मारुती मंदिर सर्कलमध्ये उघड्या आभाळाखाली पांघरूण घेऊन झोपावे लागले.त्यामुळे भरतीसाठी आलेल्या हजारो उमेदवारांचे हाल झाले. (प्रतिनिधी)उमेदवार संख्या लाखावर जाणार!१० फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यातीलच उमेदवार सैन्य भरतीसाठी येणार आहेत. त्यामुळे यादिवशी उमेदवारांची फारशी गैरसोय होण्याची शक्यता नाही. फेब्रुवारी ११ रोजी कोल्हापूर, १३ला सांगली, १४ला गोवा, १५ला सातारा, १६, १७ला उर्वरित महाराष्ट्र, गुजरात व गोव्याच्या उमेदवारांची भरती होणार आहे. या ठिकाणांहून प्रत्येक दिवशी सुमारे १० हजारांच्यावर उमेदवार सैन्य भरतीसाठी रत्नागिरीत येण्याचा अंदाज जिल्हा सैनिक कल्याण विभागाने व्यक्त केला आहे. भरतीकाळात येणाऱ्या उमेदवारांची ही संख्या लाख ते दीड लाखांवर जाण्याची शक्यता लक्षात घेता या तरुणांची निवास व्यवस्था कशी काय होणार, याचे नियोजन अजूनही करण्यास वाव आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार येऊनही त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली नाही तर उद्यानात वास्तव्य करणे व प्रात:विधी उरकणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिक कल्याण विभागाने सतर्क राहाणे गरजेचे आहे.