शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बांधकाम विभागाविरुद्धच रोष

By admin | Updated: July 31, 2016 00:52 IST

शहरातील काही बांधकामक्षेत्राबद्दल शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून तीव्र रोष व्यक्त होऊ लागला आहे.

पुणे : बालेवाडी येथे स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेचा बांधकाम विभाग, तसेच शहरातील काही बांधकामक्षेत्राबद्दल शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून तीव्र रोष व्यक्त होऊ लागला आहे. राज्य सरकारही अशा बांधकामांशी संबंधितांवर कारवाई करण्याऐेवजी ती नियमित करण्याचा निर्णय घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून शहरात बांधकाम व्यावसायिक व सर्व सरकारी यंत्रणा यांची अभद्र युती झाल्याची टीका केली आहे. पंचायतीने शहरातील सुमारे ४० बांधकाम प्रकल्पांची यादीच मुख्यमंत्र्यांकडे देऊन त्यांनी तब्बल १ लाख ग्राहकांना फसविल्याची तक्रार केली होती. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली व पोलीस महानिदेशकांच्या वतीने एक परिपत्रक जारी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्याविरोधात पोलीस ठाण्यांमध्ये कायद्याच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कळविले. मात्र बांधकाम व्यावसायिकांच्या तीन शिखर संघटनांनी राज्याच्या गृह खात्याच्या मदतीने, विधी विभागाचे साह्य घेऊन हे परिपत्रक रद्द करून घेतले, असे पंचायतीचे म्हणणे आहे. बालेवाडी दुर्घटनेची दखल घेऊन सरकारने अशा बांधकामांची व पंचायतीने दिलेल्या ४० बांधकाम प्रकल्पांची महिनाभरात चौकशी करावी, तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायतीने दिला आहे.पुणेकर नागरिक कृती समितीनेही बालेवाडी दुर्घटना पालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभाराचाच परिणाम असल्याचे म्हटले आहे. त्या प्रकल्पाचे आर्किटेक्ट व अन्य संबंधितांवर कारवाई होईलच, पण पालिकेच्या बांधकाम विभागालाही यासाठी जबाबदार धरावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्मार्ट सिटी म्हणून गवगवा करणाऱ्या पालिकेच्या बांधकाम विभागाचा दर्जा मात्र क वर्गाचाच आहे, बालेवाडी दुर्घटनेतून सिद्ध झाल्याची टीका आप या राजकीय पक्षाने केली आहे.