शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग

By admin | Updated: October 26, 2015 02:57 IST

रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथे लागलेल्या आगीत तब्बल ६०हून अधिक गाळे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही

मुंबई : रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथे लागलेल्या आगीत तब्बल ६०हून अधिक गाळे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. कोट्यवधींच्या मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज गाळेधारकांसह व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. आग आणखी पसरू नये, मनुष्यहानी टळावी, यासाठी सर्वच नियंत्रण कक्षांसह रुग्णालयातील अपघात विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दुर्घटनेवेळी दिल्या होत्या. क्रॉफर्ड मार्केटला यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या आहेत. वित्तहानीही अनेकदा झाली आहे. मुळात या मार्केटमध्ये चिंचोळ्या गल्ल्या आहेत. येथील गाळे दाटीवाटीने वसलेले आहेत. शिवाय गाळ्यांलगत अडगळही मोठ्या प्रमाणात पडून असते. महापालिकेने गाळेधारकांसह येथील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गाळेधारकांनीही महापालिका प्रशासनाला न जुमानता अग्नी प्रतिबंधाचे सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत; आणि त्याचा फटकाही यापूर्वी गाळेधारकांसह व्यापाऱ्यांना अनेकदा बसला आहे. रविवारीही क्रॉफर्ड मार्केटमध्ये अग्निडोंब उसळला आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. (प्रतिनिधी)