शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहीद प्रेमदास मेंढे, मंगेश बालपांडे व नंदकुमार आत्राम यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: March 13, 2017 04:17 IST

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली

वर्धा/भंडारा/चंद्रपूर: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झाले. सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली. मृतात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मंगेश घनश्याम बालपांडे (३४) , वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथील प्रेमदास मेंढे व चंद्रपूर जिल्ह्यातल्या नंदकुमार आत्राम यांचा समावेश होता. या तिन्ही जवानांच्या पार्थिवांवर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद मंगेश बालपांडे यांच्या पश्चात आई प्रमिलाबाई, पत्नी शीतल, मुलगी पलक (४ वर्षे) व मुलगा गंधर्व (११ महिने) आहेत.रविवारी सकाळी ८.३० वाजता शहीद मंगेश यांचे पार्थिव भंडारा पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. त्यानंतर तुमसर येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शहीद मंगेश यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार चरण वाघमारे यांनी केली. यावेळी तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे रविवारी दुपारी शहीद प्रेमदासचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारी पंचधारा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी १२.३० वाजता केंद्रीय राखीव दलाचे कमांडिंग आॅफिसर मनोज ध्यानी, पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनात राखीव दलाच्या एका तुकडीने विशेष वाहनातून शहिदाचे पार्थिव आणले. लगतच्या सोनोरा (ढोक) या गावातील प्रेमदास मेंढे १९९९ च्या बॅचमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीत शासकीय सेवेत दाखल झाले. यानंतर त्याचे कुटुंबिय मुलांच्या शिक्षणासाठी पुलगाव येथे स्थलांतरीत झाले. यावेळी त्यांचा मुलगा आर्यन, मुलगी कुंजन, पत्नी हर्षदा, वृद्ध आई-वडील होते. खा. रामदास तडस यांनी पार्थिवावर केंद्र शासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करीत कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रसंगी सीआरपीएफ पोलीस दलाच्या एका तुकडीने २१ बंदुकांची फैरी झाडून मानवंदना दिली. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाद्वारे उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुष्पचक्र अर्पण केली. यावेळी खा. तडस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक डी.ही. हिरुरकर, उपनिरीक्षक मुरलीधर ठवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र किल्लेकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सरपंच सविता गावंडे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुरांडे, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, सुनीता राऊत, गजानन राऊत, पुंडलिक पांडे, नितीन बडगे, विनोद माहुरे उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथील नंदकुमार देवाजी आत्राम हे शनिवारी शहीद झाले. त्यांचे पार्थिव चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा येथे रविवारी आणल्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)