शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी! माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या गावात गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:54 IST

मागील अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे होता

चंद्रपूर - एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विदारक स्थिती पुढे आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मूळ गावात नाल्यावर पूल नसल्यानं गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. वडेट्टीवारांची जन्मभूमी असलेल्या करंजी गावात रवी आत्राम यांचं गुरुवारी निधन झालं. 

करंजी गावात असणारा नाला पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. परंतु या नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यातच गुरुवारी आत्राम यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा गावकऱ्यांना गुडघाभर पाण्यातून काढावी लागली. हा वेदनादायी प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. विकासाच्या बाता करणारे राजकारणी त्यांच्याच गावातील विकास करू शकत नसल्याची खंत अनेकांनी मांडली. 

मागील अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळी मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार विजय वडेट्टीवार यांच्याकडे होता. त्याचसोबत चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र वडेट्टीवारांच्या जन्मगावीच विकासाचा दावा फोल ठरल्याचं करंजी येथील घटनेने उघड झालं आहे. गावातील लोकांना नाल्यातून वाट काढताना कसरत करावी लागते. गुरुवारी अत्राम यांच्या अंत्ययात्रेला गावकरी आमराईतील नाला ओलांडून जात होते. पावसामुळे आमराई नाला ओसांडून वाहत आहे. मात्र नाल्यावर पूल नसल्यानं हा प्रसंग गावकऱ्यांवर आला आहे. 

करंजी गावातील लोकसंख्या ५ हजारांच्या वर आहे. याठिकाणी स्मशानभूमीला जाताना नाला ओलांडावा लागतो. त्यामुळे गावकऱ्यांनी नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी वारंवार केली. ग्रामपंचायतीत हा ठराव मांडला परंतु अद्यापही मागणी पूर्ण झाली नाही. अलीकडेच काँग्रेसनं करंजी गावातून आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ केला. त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे तिन्हीही आमदार उपस्थित होते. त्यानंतर घडलेल्या या प्रसंगामुळे अनेकांचं या समस्येवर लक्ष केंद्रीत झाले आहे. मागील महिनाभरापासून विदर्भात पाऊस खूप पडतोय. जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी आहे. गावच्या गावं आणि शेतही पाण्याखाली आहे. त्यात मृत माणसाची अंत्ययात्रा नेतानाही गावकऱ्यांना पूल नसल्यानं जीवघेणा मार्ग पत्करावा लागल्याचं चित्र समोर आले आहे.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार