शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पाकच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 23:33 IST

घोषणांनी परिसर दणाणला : कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची मागणी

सायगाव : आनेवाडी येथील रहिवासी व भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी मोर्चा काढला. यावेळी पाकविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चातग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी जाधव यांनी शेती खरेदी करून येथील शेतात घर बांधले होते. तेथे कुटुंबीयांसमवेत राहत असलेले जाधव हे या ठिकाणी सामाजिक कामाने अल्पावधित परिचित झाले होते. ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध झाले होते. कुलभूषण जाधव हे प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेत. त्यामुळेच आनेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांच्या सुटकेसाठी तसेच पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय-हाय, नवाज शरीफ मुर्दाबाद,’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून, त्यांना यामध्ये गोवण्यात आले आहे. भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात सरपंच अश्विनी शिंदे, उपसभापती सदाशिव टिळेकर, अध्यक्ष बबन फरांदे, सचिन शेवते, जयदेश जगताप, सुभाष पाडळे, संतोष पिसाळ, उमेश तोडरमल, शिवाजी फरांदे, प्रभाकर गोरे, स्वप्नील कदम, अविनाश फरांदे, विश्वास पवार,भीमा कोळी, निखिल फरांदे, श्वेतेश फरांदे यांच्यासह ग्रामस्थ युवक, रिक्षा संघटना मोर्चात सहभागी होते. (वार्ताहर)गृहमंत्री, परराष्ट्र मंत्र्यांना निवेदनआनेवाडी परिसरातील लोकांना देशसेवेचे धडे देणारे जाधव असे काही करणारे असतील, असे मुळीच वाटत नाही. मुळात पाकिस्तानी सरकारने खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केली असल्याने भारत सरकारनेही यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन त्यांच्या सुटकेसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन पाठवण्यात येणार आहे, असे यावेळी सांगिण्यात आले. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. पाकिस्तानबरोबर असणारे सर्वच संबंध भारताने तोडून टाकावेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकची मुस्कटदाबी करावी.- जयदेश जगताप, ग्रामस्थ, आनेवाडीकुलभूषण जाधवांसाठी साताऱ्यातील युवा वर्ग एकत्र; स्वाक्षरी मोहिमेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांची मुक्तता व्हावी, यासाठी साताऱ्यातील युवा वर्ग एकत्र आला आहे. कोणत्याही परिस्थितीत जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकारने रचलेल्या कथित आरोपाबाबत जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. साताऱ्यातही याचे पडसाद उमटत असून, विविध स्तरांतून पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. साताऱ्यातील युवा वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आला आहे. ‘चला वाचवू कुलभूषण जाधवांचे प्राण’ अशा आशयाखाली युवकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या निषेधार्थ मोहीम उघडली आहे. या मोहिमेला युवा वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युवकांनी शहरातून स्वाक्षरी मोहीम राबविली असून, या स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयामध्ये जाऊन ‘कुलभूषण जाधवांची फाशी रोखण्यासाठी पुढे या,’ असा संदेश दिला जात आहे. प्राध्यापक, शिक्षकांनाही आवाहन करण्यात येत आहे. ‘अजून वेळ गेली नाही. तोपर्यंतच एकत्र या, आणि शासनाला आपल्या भावना पोहोचण्यासाठी आपले मत कळवा,’ असे भावनिक आवाहनही युवकांकडून करण्यात येत आहे.