शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

बोगस नळपाणी योजनेविरोधात जव्हारमध्ये मोर्चा

By admin | Updated: May 14, 2017 02:33 IST

नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली आहे. जागोजागी लागलेली गळती, वापरलेले साहित्य मुदत बाह्य तसेच जुनाट असल्याने ते पाणी घरोघरी पोहचण्या ऐवजी मातीमोल होत आहे. या विरोधात तहाणलेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मोर्चा काढला. जुना राजवाडा ते पंचायत समिती या मार्गावरुन काढलेल्या या मोर्चामध्ये ग्रामसेवकाने केलेल्या मनमानीचा व ठेकेदाराने केलेल्या कामाजे वाभाडे काढण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या दोन ते तीन तासाच्या बैठकीनंतर प्रशासनानकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन मागे घेतले. पाण्याची समस्या कायम दुर करण्यासाठी प्रयत्न करावा जेथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल तेथे कायमची पाण्याची व्यवस्था करावी असे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी आवाहन केले होते, मात्र येथील मुजोर अधिकाऱ्यांना विहिरीला पाणी आहे. फक्त दुरूस्ती करायची परंतू तीही यांचे कडून होत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी केली. कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हवर्ष २०१३ ते २०१६ या काळात पुर्ण झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा दर्जा अगदिच सुमार असल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. शासकीय कामकाजात निविदा प्रसिध्द करतांना काम पुर्ण करण्याची वेळ निश्चित केलेली असते. एखादी नळपाणी योजना असेल तर तिला किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधी असतो. मग ही योजना पुर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच नियमानुसार कालावधीनंतर दरमहा ठरविलेल्या टक्केवारीनुसार दंड आकरण्यात येतो. तो दंडही आकरण्यात यावा व निकृष्ठ केलेल्या काम अंदाजपत्रका नुसार करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विहिरही नादुरूस्त असून तीही तातडीने दुरूस्त करावी तसेच नांदगांव ते टोकरखांड या चार कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामास अग्रक्रम देण्यात आला होता. मात्र आठ महिंने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. >ग्रामसेवकच बनले ठेकेदारया सर्व बाबींना जबाबदार ग्रामसेवक डि. सी. पाटील मात्र नेहमीप्रमाणे गैरहजर होते. हा सर्व प्रकाराच्या मागे तेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे मांडले आहे. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत, यात बहुतेक ग्रामसेवक ठेकेदार असून कुठलेही कामे ते स्वत: ठेकेदार पध्दतीने करून घेत आहेत. तसेच वाटेल तसे व निकृष्ठ दर्जाचे काम यांचेकडून होत आहेत. त्यांच्या विरोधातील शेकडो लेखी तक्रारी धुळखात असून गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी एकाही ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही.