शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

बोगस नळपाणी योजनेविरोधात जव्हारमध्ये मोर्चा

By admin | Updated: May 14, 2017 02:33 IST

नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली आहे. जागोजागी लागलेली गळती, वापरलेले साहित्य मुदत बाह्य तसेच जुनाट असल्याने ते पाणी घरोघरी पोहचण्या ऐवजी मातीमोल होत आहे. या विरोधात तहाणलेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मोर्चा काढला. जुना राजवाडा ते पंचायत समिती या मार्गावरुन काढलेल्या या मोर्चामध्ये ग्रामसेवकाने केलेल्या मनमानीचा व ठेकेदाराने केलेल्या कामाजे वाभाडे काढण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या दोन ते तीन तासाच्या बैठकीनंतर प्रशासनानकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन मागे घेतले. पाण्याची समस्या कायम दुर करण्यासाठी प्रयत्न करावा जेथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल तेथे कायमची पाण्याची व्यवस्था करावी असे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी आवाहन केले होते, मात्र येथील मुजोर अधिकाऱ्यांना विहिरीला पाणी आहे. फक्त दुरूस्ती करायची परंतू तीही यांचे कडून होत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी केली. कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हवर्ष २०१३ ते २०१६ या काळात पुर्ण झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा दर्जा अगदिच सुमार असल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. शासकीय कामकाजात निविदा प्रसिध्द करतांना काम पुर्ण करण्याची वेळ निश्चित केलेली असते. एखादी नळपाणी योजना असेल तर तिला किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधी असतो. मग ही योजना पुर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच नियमानुसार कालावधीनंतर दरमहा ठरविलेल्या टक्केवारीनुसार दंड आकरण्यात येतो. तो दंडही आकरण्यात यावा व निकृष्ठ केलेल्या काम अंदाजपत्रका नुसार करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विहिरही नादुरूस्त असून तीही तातडीने दुरूस्त करावी तसेच नांदगांव ते टोकरखांड या चार कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामास अग्रक्रम देण्यात आला होता. मात्र आठ महिंने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. >ग्रामसेवकच बनले ठेकेदारया सर्व बाबींना जबाबदार ग्रामसेवक डि. सी. पाटील मात्र नेहमीप्रमाणे गैरहजर होते. हा सर्व प्रकाराच्या मागे तेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे मांडले आहे. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत, यात बहुतेक ग्रामसेवक ठेकेदार असून कुठलेही कामे ते स्वत: ठेकेदार पध्दतीने करून घेत आहेत. तसेच वाटेल तसे व निकृष्ठ दर्जाचे काम यांचेकडून होत आहेत. त्यांच्या विरोधातील शेकडो लेखी तक्रारी धुळखात असून गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी एकाही ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही.