शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

बोगस नळपाणी योजनेविरोधात जव्हारमध्ये मोर्चा

By admin | Updated: May 14, 2017 02:33 IST

नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायतीची नळपाणी योजनेचा बोजवारा उडाला असून तब्बल ४८ लाख रूपये खर्चून उभी राहिलेली नळपाणी योजना अवघ्या तीन वर्र्षातच वाया गेली आहे. जागोजागी लागलेली गळती, वापरलेले साहित्य मुदत बाह्य तसेच जुनाट असल्याने ते पाणी घरोघरी पोहचण्या ऐवजी मातीमोल होत आहे. या विरोधात तहाणलेल्या ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मोर्चा काढला. जुना राजवाडा ते पंचायत समिती या मार्गावरुन काढलेल्या या मोर्चामध्ये ग्रामसेवकाने केलेल्या मनमानीचा व ठेकेदाराने केलेल्या कामाजे वाभाडे काढण्यात आले. सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाच्या दोन ते तीन तासाच्या बैठकीनंतर प्रशासनानकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन मागे घेतले. पाण्याची समस्या कायम दुर करण्यासाठी प्रयत्न करावा जेथे टॅँकरने पाणी पुरवठा होत असेल तेथे कायमची पाण्याची व्यवस्था करावी असे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णू सवरा यांनी आवाहन केले होते, मात्र येथील मुजोर अधिकाऱ्यांना विहिरीला पाणी आहे. फक्त दुरूस्ती करायची परंतू तीही यांचे कडून होत नसल्याची खंत यावेळी ग्रामस्थांनी केली. कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हवर्ष २०१३ ते २०१६ या काळात पुर्ण झालेल्या नळपाणी योजनेच्या कामाचा दर्जा अगदिच सुमार असल्याने तिला जागोजागी गळती लागली आहे. शासकीय कामकाजात निविदा प्रसिध्द करतांना काम पुर्ण करण्याची वेळ निश्चित केलेली असते. एखादी नळपाणी योजना असेल तर तिला किमान सहा महिने ते एक वर्ष कालावधी असतो. मग ही योजना पुर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. तसेच नियमानुसार कालावधीनंतर दरमहा ठरविलेल्या टक्केवारीनुसार दंड आकरण्यात येतो. तो दंडही आकरण्यात यावा व निकृष्ठ केलेल्या काम अंदाजपत्रका नुसार करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.विहिरही नादुरूस्त असून तीही तातडीने दुरूस्त करावी तसेच नांदगांव ते टोकरखांड या चार कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामास अग्रक्रम देण्यात आला होता. मात्र आठ महिंने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर तयार करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. >ग्रामसेवकच बनले ठेकेदारया सर्व बाबींना जबाबदार ग्रामसेवक डि. सी. पाटील मात्र नेहमीप्रमाणे गैरहजर होते. हा सर्व प्रकाराच्या मागे तेच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी वाडेकर यांच्याकडे मांडले आहे. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत, यात बहुतेक ग्रामसेवक ठेकेदार असून कुठलेही कामे ते स्वत: ठेकेदार पध्दतीने करून घेत आहेत. तसेच वाटेल तसे व निकृष्ठ दर्जाचे काम यांचेकडून होत आहेत. त्यांच्या विरोधातील शेकडो लेखी तक्रारी धुळखात असून गटविकास अधिकारी तथा मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी एकाही ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही.