शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पदरगडच्या झऱ्यांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: July 5, 2015 01:59 IST

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण

अजय महाडीक , मुंबईशिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण विहिरींचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे अस्सल मुंबईकर चाकरमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेऊन त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांच्या मिशनमध्ये त्यांनी शिडीघाटातील गंजून मोडकळीस आलेली शिडी दुरुस्त केल्याने पर्यटकांची माठी अडचण दूर झाली आहे.सुटीच्या निमित्ताने उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुटीत हजारो शिवपे्रमी व पर्यटक इकडे येतात. मात्र वर पाणी नसल्याने ते कासावीस होतात. गडाच्या मध्यावर विहीर आहे. मात्र पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, फास्टफूडची पाकिटे, बीअरच्या बाटल्या आदी कचऱ्यामुळे तिला पाणवठ्याऐवजी उकिरड्याचे स्वरूप आले आहे.दोन दिवसांच्या खडतर परिश्रमातून या नऊ गिरीमित्रांनी येथील किल्लेप्रेमींच्या पर्यटनातील मोठा अडथळा दूर केला आहे. ‘गिरीदुर्ग संवर्धननायच् समर्पितम’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘गिरीमित्र प्रतिष्ठान, मुंबई’ ही संघटना गेली ११ वर्षे किल्ले संवर्धनाचे काम करीत आहे. बदलापूरच्या किल्ले चंदेरी, कर्जतजवळचा ढाका किल्ला या ठिकाणी प्रतिष्ठानचे अनेक वर्षांपासून कार्य सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात इतिहास अभ्यासक भगवान चिले यांच्यासह मंगेश कोयंडे, दीपा कोळवणकर,चंद्रशेखर पाटील, अमोल मोरे, सतीश झंझाड, बबन कुरतडकर, रूपेश पालवे, शैलेंद्र धुरी, संदीप भिसे आणि अनिरुद्ध कुरतडकर हे गिरीमित्र कर्जतजवळच्या भीमाशंकरच्या वाटेवरील पदरगडच्या किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले होते. खाडस गाव सोडल्यावर अगदी पदरगडावर जाईपर्यंत त्यांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवले. या अनुभवातूनच या गिरीमित्रांना गडावर पाणी असावे, ही प्रेरणा मिळाली.अशी आखली योजना...१ पदरगडचा अभ्यास करताना त्यांना गडाच्या मध्यावर एक शिवकालीन विहीर दिसली. पण ती अतिशय भग्न अवस्थेत व पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याने बुजलेली होती. गिरीमित्रच्या शिलेदारांनी १६ व १७ जून २०१५ रोजी येथे श्रमदान करायचे ठरविले.२ मोहिमेसाठी १० सदस्यांनी १६ तारखेला कर्जत कोठीवडी गाठत शिडीघाटामार्गे पदरगड वाडीत पोचले. तेथे तुकाराम कुदळे या ग्रामस्थांनी कुदळ, फावडे, लोखंडी शिडीसारखे साहित्य गिरीमित्रांना पुरवले. या साहित्याचा वापर करून विहीर साडेचार फूट खोदण्यात आली.३ या शिवकालीन विहिरीतून सुरुवातीला घाण पाणी, पालापाचोळा काढण्यात आला. विहीर साफ करताना प्लास्टिक व काचेच्या पिशव्या, बीअरचे कॅन, प्लास्टिकच्या पिशव्या व रॅफर काढण्यात आले. तब्बल १५० बादल्या चिखल व ७० बादल्या घाण पाणी काढल्यानंतर कातळ दिसू लागले. बुजलेले झरेही खळखळू लागले. आणखीही खूप करण्यासारखे...आता पावसाची रिपरिपही छान सुरू झाल्याने विहिरीत पाणी भरले आहे. रानात जाणाऱ्या गावकऱ्यांनाही येथे तहान भागवता येते आहे. पुढच्या मोहिमेमध्ये गिरीमित्र गडाच्या वाटेवर दिशादर्शक फलक लावणार आहेत. गडावरील गुहा मुक्कमयोग्य बनविणे, अवघड मार्गावर बोल्टिंग करून रोप बसविणे, किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेणे अशी अनेक कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. ही मोहीम गिरीमित्रांच्या मदतीने आॅगस्ट महिन्यात राबविण्यात येणार असल्याचे मंगेश कोयंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.