शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पदरगडच्या झऱ्यांनी घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: July 5, 2015 01:59 IST

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण

अजय महाडीक , मुंबईशिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण विहिरींचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे अस्सल मुंबईकर चाकरमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेऊन त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांच्या मिशनमध्ये त्यांनी शिडीघाटातील गंजून मोडकळीस आलेली शिडी दुरुस्त केल्याने पर्यटकांची माठी अडचण दूर झाली आहे.सुटीच्या निमित्ताने उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुटीत हजारो शिवपे्रमी व पर्यटक इकडे येतात. मात्र वर पाणी नसल्याने ते कासावीस होतात. गडाच्या मध्यावर विहीर आहे. मात्र पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, फास्टफूडची पाकिटे, बीअरच्या बाटल्या आदी कचऱ्यामुळे तिला पाणवठ्याऐवजी उकिरड्याचे स्वरूप आले आहे.दोन दिवसांच्या खडतर परिश्रमातून या नऊ गिरीमित्रांनी येथील किल्लेप्रेमींच्या पर्यटनातील मोठा अडथळा दूर केला आहे. ‘गिरीदुर्ग संवर्धननायच् समर्पितम’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘गिरीमित्र प्रतिष्ठान, मुंबई’ ही संघटना गेली ११ वर्षे किल्ले संवर्धनाचे काम करीत आहे. बदलापूरच्या किल्ले चंदेरी, कर्जतजवळचा ढाका किल्ला या ठिकाणी प्रतिष्ठानचे अनेक वर्षांपासून कार्य सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात इतिहास अभ्यासक भगवान चिले यांच्यासह मंगेश कोयंडे, दीपा कोळवणकर,चंद्रशेखर पाटील, अमोल मोरे, सतीश झंझाड, बबन कुरतडकर, रूपेश पालवे, शैलेंद्र धुरी, संदीप भिसे आणि अनिरुद्ध कुरतडकर हे गिरीमित्र कर्जतजवळच्या भीमाशंकरच्या वाटेवरील पदरगडच्या किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले होते. खाडस गाव सोडल्यावर अगदी पदरगडावर जाईपर्यंत त्यांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवले. या अनुभवातूनच या गिरीमित्रांना गडावर पाणी असावे, ही प्रेरणा मिळाली.अशी आखली योजना...१ पदरगडचा अभ्यास करताना त्यांना गडाच्या मध्यावर एक शिवकालीन विहीर दिसली. पण ती अतिशय भग्न अवस्थेत व पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याने बुजलेली होती. गिरीमित्रच्या शिलेदारांनी १६ व १७ जून २०१५ रोजी येथे श्रमदान करायचे ठरविले.२ मोहिमेसाठी १० सदस्यांनी १६ तारखेला कर्जत कोठीवडी गाठत शिडीघाटामार्गे पदरगड वाडीत पोचले. तेथे तुकाराम कुदळे या ग्रामस्थांनी कुदळ, फावडे, लोखंडी शिडीसारखे साहित्य गिरीमित्रांना पुरवले. या साहित्याचा वापर करून विहीर साडेचार फूट खोदण्यात आली.३ या शिवकालीन विहिरीतून सुरुवातीला घाण पाणी, पालापाचोळा काढण्यात आला. विहीर साफ करताना प्लास्टिक व काचेच्या पिशव्या, बीअरचे कॅन, प्लास्टिकच्या पिशव्या व रॅफर काढण्यात आले. तब्बल १५० बादल्या चिखल व ७० बादल्या घाण पाणी काढल्यानंतर कातळ दिसू लागले. बुजलेले झरेही खळखळू लागले. आणखीही खूप करण्यासारखे...आता पावसाची रिपरिपही छान सुरू झाल्याने विहिरीत पाणी भरले आहे. रानात जाणाऱ्या गावकऱ्यांनाही येथे तहान भागवता येते आहे. पुढच्या मोहिमेमध्ये गिरीमित्र गडाच्या वाटेवर दिशादर्शक फलक लावणार आहेत. गडावरील गुहा मुक्कमयोग्य बनविणे, अवघड मार्गावर बोल्टिंग करून रोप बसविणे, किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेणे अशी अनेक कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. ही मोहीम गिरीमित्रांच्या मदतीने आॅगस्ट महिन्यात राबविण्यात येणार असल्याचे मंगेश कोयंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.