शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:40 IST

मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही.देशभर कांदा टंचाई सुरू असल्याने आॅगस्टच्या सुरुवातीला बाजारभाव वाढू लागले आहेत. नवीन पीक येण्यास अवकाश असल्याने बाजारभाव १००पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन कांद्याची आयात करण्यावर अनेक व्यापाºयांनी लक्ष दिले होते. इजिप्तवरून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात येत आहे. मंगळवारी मुंबई बाजार समितीमध्ये चार टन मालाची आवक झाली आहे; परंतु यामधील बहुतांश माल खराब होता. गडद लाल रंगाच्या या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. दिवसभरामध्ये कांद्याची विक्रीच झालेली नाही.मुसळधार पावसामुळे बुधवारीही एपीएमसीमध्ये मंदीची स्थिती असल्याने विदेशी कांदा फेकून देण्याची वेळ येणार आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये आवकही समाधानकारक होत असल्याने विदेशी कांद्याला योग्य भाव मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदेशातून येणाºया कांद्याला मुंबईमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने, हा कांदा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने आयात सुरू ठेवण्यावरही प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. मुंबईमध्ये सोमवारी २११४ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्याने आवक ८१२ टनवर आली आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असल्याने ग्राहक एपीएमसीकडे येण्याची शक्यता नसल्याने बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.इजिप्तवरून आलेल्या कांद्याचा रंग गडद लाल आहे. चाळीमध्ये साठवलेल्या राज्यातील कांद्याप्रमाणेच त्याचाही आकार आहे; परंतु आयात होण्यासाठी लागलेला वेळ व खराब हवामान यामुळे कांदा काळा पडू लागला असून, त्याला मुंबईत बाजारभाव मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार