शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:40 IST

मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही.देशभर कांदा टंचाई सुरू असल्याने आॅगस्टच्या सुरुवातीला बाजारभाव वाढू लागले आहेत. नवीन पीक येण्यास अवकाश असल्याने बाजारभाव १००पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन कांद्याची आयात करण्यावर अनेक व्यापाºयांनी लक्ष दिले होते. इजिप्तवरून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात येत आहे. मंगळवारी मुंबई बाजार समितीमध्ये चार टन मालाची आवक झाली आहे; परंतु यामधील बहुतांश माल खराब होता. गडद लाल रंगाच्या या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. दिवसभरामध्ये कांद्याची विक्रीच झालेली नाही.मुसळधार पावसामुळे बुधवारीही एपीएमसीमध्ये मंदीची स्थिती असल्याने विदेशी कांदा फेकून देण्याची वेळ येणार आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये आवकही समाधानकारक होत असल्याने विदेशी कांद्याला योग्य भाव मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदेशातून येणाºया कांद्याला मुंबईमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने, हा कांदा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने आयात सुरू ठेवण्यावरही प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. मुंबईमध्ये सोमवारी २११४ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्याने आवक ८१२ टनवर आली आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असल्याने ग्राहक एपीएमसीकडे येण्याची शक्यता नसल्याने बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.इजिप्तवरून आलेल्या कांद्याचा रंग गडद लाल आहे. चाळीमध्ये साठवलेल्या राज्यातील कांद्याप्रमाणेच त्याचाही आकार आहे; परंतु आयात होण्यासाठी लागलेला वेळ व खराब हवामान यामुळे कांदा काळा पडू लागला असून, त्याला मुंबईत बाजारभाव मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार