शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:40 IST

मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही

नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही.देशभर कांदा टंचाई सुरू असल्याने आॅगस्टच्या सुरुवातीला बाजारभाव वाढू लागले आहेत. नवीन पीक येण्यास अवकाश असल्याने बाजारभाव १००पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन कांद्याची आयात करण्यावर अनेक व्यापाºयांनी लक्ष दिले होते. इजिप्तवरून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात येत आहे. मंगळवारी मुंबई बाजार समितीमध्ये चार टन मालाची आवक झाली आहे; परंतु यामधील बहुतांश माल खराब होता. गडद लाल रंगाच्या या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. दिवसभरामध्ये कांद्याची विक्रीच झालेली नाही.मुसळधार पावसामुळे बुधवारीही एपीएमसीमध्ये मंदीची स्थिती असल्याने विदेशी कांदा फेकून देण्याची वेळ येणार आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये आवकही समाधानकारक होत असल्याने विदेशी कांद्याला योग्य भाव मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदेशातून येणाºया कांद्याला मुंबईमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने, हा कांदा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने आयात सुरू ठेवण्यावरही प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. मुंबईमध्ये सोमवारी २११४ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्याने आवक ८१२ टनवर आली आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असल्याने ग्राहक एपीएमसीकडे येण्याची शक्यता नसल्याने बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.इजिप्तवरून आलेल्या कांद्याचा रंग गडद लाल आहे. चाळीमध्ये साठवलेल्या राज्यातील कांद्याप्रमाणेच त्याचाही आकार आहे; परंतु आयात होण्यासाठी लागलेला वेळ व खराब हवामान यामुळे कांदा काळा पडू लागला असून, त्याला मुंबईत बाजारभाव मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार