शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 08:11 IST

मालकावर गुन्हा दाखल, खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे.

रवींद्र साळवे मोखाडा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना दोन हजार रुपयांत  अडीच महिने राबविणाऱ्या व कातकरी कुटुंबाची पिळवणूक करणाऱ्या  खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे (वय ६०), पत्नी लक्ष्मीबाई (वय ५५), मुलगा गणेश (वय १५) व मुलगी सविता (वय १२) हे कुटुंब जून महिन्यात  गणेशवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते. यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी ५०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन या कातकरी कुटुंबाची पिळवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे. तसेच दोन ते अडीच महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदलादेखील दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन हजाराच्या दिलेल्या आगाऊ रकमेत चार व्यक्तींना अडीच महिने राबवून घेतले. यामुळे  मालकाच्या पिळवणुकीला कंटाळून अखेर १४ तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायी-पायी निघाले. थोडीफार शिल्लक असलेल्या गंजीपुंजीतून गणेश, सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडे करून त्यांनी त्र्यंबकेश्वर गाठले व तेथून पायी येत असताना दुपारी १२.३० च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षजवळ नवसू गारे, संतोष झिंजुर्डे, लक्षण खाडे, राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक पंडित यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संघटनेच्या  पुढाकाराने  वेठबिगारीचा गुन्हा दाखल केला.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम  अनेक कातकरी कुटुंबे वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत. अशा शेकडो  कुटुंबांकडे शेती नाही, घर नाही. शासकीय कागदपत्रे नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या पीडित कुटुंबांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. याला जबाबदार कोण? - विवेक पंडित, श्रमजीवी संघटना