शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 08:11 IST

मालकावर गुन्हा दाखल, खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे.

रवींद्र साळवे मोखाडा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना दोन हजार रुपयांत  अडीच महिने राबविणाऱ्या व कातकरी कुटुंबाची पिळवणूक करणाऱ्या  खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे (वय ६०), पत्नी लक्ष्मीबाई (वय ५५), मुलगा गणेश (वय १५) व मुलगी सविता (वय १२) हे कुटुंब जून महिन्यात  गणेशवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते. यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी ५०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन या कातकरी कुटुंबाची पिळवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे. तसेच दोन ते अडीच महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदलादेखील दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन हजाराच्या दिलेल्या आगाऊ रकमेत चार व्यक्तींना अडीच महिने राबवून घेतले. यामुळे  मालकाच्या पिळवणुकीला कंटाळून अखेर १४ तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायी-पायी निघाले. थोडीफार शिल्लक असलेल्या गंजीपुंजीतून गणेश, सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडे करून त्यांनी त्र्यंबकेश्वर गाठले व तेथून पायी येत असताना दुपारी १२.३० च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षजवळ नवसू गारे, संतोष झिंजुर्डे, लक्षण खाडे, राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक पंडित यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संघटनेच्या  पुढाकाराने  वेठबिगारीचा गुन्हा दाखल केला.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम  अनेक कातकरी कुटुंबे वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत. अशा शेकडो  कुटुंबांकडे शेती नाही, घर नाही. शासकीय कागदपत्रे नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या पीडित कुटुंबांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. याला जबाबदार कोण? - विवेक पंडित, श्रमजीवी संघटना