शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

चार नक्षलवाद्यांनी केली घिसू मट्टामीची हत्या

By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST

एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

आठवड्यात दोन हत्या : राजकीय नेत्यांच्या हत्येमुळे दहशतगडचिरोली : एटापल्ली पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची हत्या  नक्षलवाद्यांच्या रॅपीड अँक्शन फोर्सच्या चार ते पाच नक्षलवाद्यांनी केल्याचे प्राथमिक माहितीत  समोर आले आहे. एटापल्ली येथे गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता पंचायत समिती सभापतीच्या निवासस्थानासमोर  मट्टामी बसून होते. त्यावेळी ४ ते ५ च्या संख्येत नक्षलवादी त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले.  बाहेर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी  जीव वाचविण्यासाठी घरात प्रवेश केला. त्यांच्या  पत्नी पंचायत समितीच्या सभापती ललीता मट्टामी घरात होत्या. त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू  आला. परंतु तोपर्यंंत नक्षलवाद्यांनी  घरात शिरुन त्यांच्यावर ५ ते ६ गोळ्या झाडून त्यांना ठार करुन  नक्षलवादी पळून गेले होते.  याच दरम्यान गावाच्या बाहेर आणखी काही नक्षलवादी उभे होते, अशी एटापल्ली परिसरात चर्चा  आहे. त्यानंतर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात मट्टामी यांचा मृतदेह नेण्यात आला. परंतु तेथे त्यांच्या  मृतदेहावर शवविच्छेदन झाले नाही. त्यामुळे गडचिरोली येथे शुक्रवारी सकाळी जिल्हा सामान्य  रूग्णालयात शवविच्छेदन करून हालेवारा या त्यांच्या मूळ गावी मृतदेह पोहोचविण्यात आला. या  आठवड्यात नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दोन राजकीय नेत्यांची हत्या केल्याने ग्रामीण  भागातील राजकीय वातावरण पुन्हा दहशतीखाली आले आहे. मध्यंतरी नक्षलवाद्यांवर पोलीस  वरचढ झाल्याचे चित्र निर्माण  झाले होते. परंतु आता पुन्हा नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे.२५ मे रोजी रविवारी अहेरी तालुक्यातील निमलगुडम येथे माजी जि.प. सदस्य बापू तलांडी यांची  नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेची शाई वाळते न् वाळते तोच एटापल्ली पंचायत  समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली.  यापूर्वीही एटापल्ली पंचायत समितीचे सभापती राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवल सावकार  अतकमवार यांचीही नक्षलवाद्यांनी सायंकाळच्याच वेळी भर चौकात हत्या केली होती. तसेच  सायंकाळच्या सुमारास कंत्राटदार संजय खेडेकर यांचीही एटापल्ली गावातच नक्षलवाद्यांनी हत्या  केली होती. गुरूवारची ही तिसरी हत्या आहे. रविवारी याच आठवड्यात नक्षलवाद्यांनी माजी जिल्हा  परिषद सदस्य बापू तलांडी यांचीही निमलगुडम गावाजवळ अहेरी तालुक्यात हत्या केली. मट्टामी हे  हालेवारा गावचे राहणारे आहेत. त्यांचे तेथे घर व शेती आहे. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी त्यांनी  गाव सोडून देऊन एटापल्लीत घर थाटले होते. राजकीय, सामाजिक जीवनात वावरताना जनतेचे  अनेक प्रश्न त्यांनी मांडले होते. त्यामुळे ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आले, अशी चर्चा आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)