शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार आमदारांनी दिलेले राजीनामे मंजूर; राधाकृष्ण विखेंचा राजीनामा आलाच नाही

By अतुल कुलकर्णी | Updated: May 15, 2019 00:45 IST

लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या राज्यातील १५ आमदारांपैकी शिवसेनेच्या तीन आणि भाजपचे एक अशा चार आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ते मंजूर केले आहेत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या राज्यातील १५ आमदारांपैकी शिवसेनेच्या तीन आणि भाजपचे एक अशा चार आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ते मंजूर केले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ६३ वरुन ६० वर, तर भाजपाचे १२२ वरुन १२१ वर आले आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे दिला असला, तरीही तो अद्याप विधानभवनात आलेला नाही, असे विधिमंडळ सचिवालयाकडून सांगण्यात आले.शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव आणि भाजपाचे अनिल गोटे या चौघांनी लोकसभा निवडणूक लढविली. या चौघांनीही स्वत:चे पक्ष सोडून अन्य पक्षातर्फे निवडणूक लढवली होती, म्हणून त्यांना राजीनाना द्यावा लागला. अन्यथा, त्यांचा अर्ज बाद झाला असता.लोकसभा निवडणुकीत विधानसभचे १४ सदस्य, तर विधानपरिषदेतून काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी नशिब आजमावले. त्यात राष्टÑवादीचे राणा जगजीतसिंह पाटील आणि संग्राम जगताप, काँग्रेसचे कुणाल पाटील, के.सी. पाडवी आणि भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेतर्फे हेमंत पाटील, भाजपचे गिरीष बापट, बीआरपीतर्फे बळीराम सिरकर, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि भाकपचे जीवा गावित यांचा समावेश आहे.हे सर्व जण स्वपक्षातर्फे निवडणुकीत उतरले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले नाहीत. यापैकी जे कोणी निवडून येतील त्यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर १४ दिवसात त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व आपोआप रद्द होईल. काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने राजीमाने मंजूर झालेल्या ४ जागा व जे निवडून येतील त्यांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार नाही, असेही एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

बंडखोरांवर काँग्रेस कारवाई करणार का?राष्टÑवादीचे संख्याबळ ४१ असले तरी हणुमंत डोळस यांच्या निधनामुळे ते आता४० वर आले आहे. काँग्रेसचे संख्याबळ कागदोपत्री जरी ४२ दिसत असले तरी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे. पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी याआधीच सांगितले आहे.शिवाय नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकर यांनी स्वत:च्या कार्यालयावर भाजपा फलक लावून शिवसेनेचा प्रचार केला होता. अब्दुल सत्तार यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे तर जयकुमार गोरे यांनी भाजपाचा प्रचार केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. त्यामुळे सत्तार वगळता अन्य चौघांवर कारवाई झाली तर काँग्रेसचे संख्याबळ विधानसभेत ३७ वर येईल. विरोधी पक्ष नेतेपद आपल्याकडे रहावे म्हणून काँग्रेस या सगळ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न चर्चेत आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtraमहाराष्ट्र