शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विदर्भातील चार पालकमंत्री बदलले

By admin | Updated: July 31, 2014 04:02 IST

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विदर्भातील चार पालकमंत्र्यांची अदलाबदल केली.

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विदर्भातील चार पालकमंत्र्यांची अदलाबदल केली. रोहयो मंत्री नितीन राऊत यांना नागपूर,तर राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद दिले. दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपले कट्टर समर्थक मुळक यांची नागपूरच्या पालकमंत्रीपदी नेमणूक केली होती, पण त्यावर पक्षांतर्गत तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने त्या निर्णयाला त्याच दिवशी स्थगिती द्यावी लागली होती. आजच्या निर्णयानुसार नागपूरचे पालकमंत्रीपद राऊत यांना देताना मुळक यांना भंडाऱ्याला पाठविण्यात आले. मुळक विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर राऊत हे उत्तर नागपुरातून विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना यवतमाळ तर सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री रणजित कांबळे यांना वर्धा या त्यांच्या गृह जिल्'ाचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मुळक वगळता इतर तिघांना गृहजिल्हा मिळाला आणि ‘घर की मुर्गी...’या न्यायाने की काय मुळक यांना पुन्हा एकदा जिल्'ाबाहेर जावे लागले. आधी ते वर्धेचे पालकमंत्री होते. ते पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवू इच्छितात. त्यांचे तिकिट आणखी पक्के व्हावे यासाठी दहा दिवसांपूर्वी त्यांना नागपूर देण्यात आले होते, पण राऊत यांच्या विरोधामुळे तो निर्णय मागे घ्यावा लागला, अशी चर्चा आहे. स्थानिक मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्याऐवजी बाहेरच्या जिल्'ातील मंत्र्याला ते दिले की पक्षांतर्गत गटबाजीला आळा बसेल असे गृहित धरून विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून बाहेरून पालकमंत्री लादले गेले. त्यामुळे बाहेरून आलेल्या मंत्र्यांना त्या जिल्'ाच्या समस्या समजत नाहीत, असे आरोप झाले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज आज खूप उशिराने का होईना पण तीन मंत्र्यांना गृहजिल्'ात पाठविले. (विशेष प्रतिनिधी)